Friday, May 24, 2013

स्वप्नांचा मृत्यू…

रोज जमेल तसा मॉर्निंग वॉक घेतो. . . एस पी कॉलेज ग्राउंड वर पहाटे -सकाळी मस्त माहोल असतो. . आरोग्य महोत्सव असतो म्हणा न . उन्हाळा सुरु झाला आणि मुलांच्या परीक्षा संपल्या तेव्हा एक नवल पाहिले . . एका कोपऱ्यावर कोवळी मिसरूड फुटलेली गोड -सावळी मुले ताजी भाजी घेवून विकायला बसली होती . खूप काही घेवून उत्साहात . बरे वाटले . पण सकाळी खिशात पैसे घेवून फिरायची गरज नसल्याने भाजी त्यांच्याकडून घ्यायची राहिलीच .

पण त्यांना पाहिले . . त्यांचे काळे भोर डोळे पहिले , लगबग पाहिली कि आदित्य ची त्यांची मैत्री करून द्यायला हवी असे वाटायचे

एकदा आदित्य च लवकर उठला . . म्हणाला ' बाबा येतो मी फिरायला ' . मला बरे वाटले . खिशात पैसे घेतले . वॉक संपला तसे आदित्य ला पुढे करून त्या अश्राप मुलांकडून भरपूर खरेदी करायला लावली . आदित्य ने दहा रुपये जास्त पण दिले त्यांना . .

मग रोज मी त्यांना पाहायचो . . आदित्य ने त्यांच्या सोबत राहून ' समर जॉब ' केला पाहिजे . . असे स्वताला बजावायचो

अचानक कधी तरी ती मुले . . त्यांचे फुटपाथ वरचे भाजीचे प्रदर्शन दिसेना झाले

काळजाचा ठोकाच चुकला . .

त्यांच्या कोवळ्या धडपडीला ,उद्योजकतेला लगेच आणि पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी प्रयत्न थांबविला होता बहुतेक . .

किती गोड मुले होती. . किती बोलावेसे वाटायचे . . कोण ,कुठली . . का रस्त्यावर भाजी विकतात . . विचारावेसे वाटायचे . . पण नाही विचारले कधी

आता ती रिकामी जागा पाहिली की काळीज गलबलून येते . .

माणसाच्या मृत्यू पेक्षा त्याच्या स्वप्नांचा मृत्यू फार भयानक असतो

त्या पोरांनी कसे सोसले असेल ?

No comments:

Post a Comment