Sunday, July 21, 2013

डान्स बार (लघु )कथा :

डान्स बार (लघु )कथा :

डान्स बार बंदी न्यायालयात टिकली नाही . पुन्हा बार सुरु होणार असे म्हटले जात आहे . एका तरुण अभियंत्याने डान्स बारचा त्या काळात सांगितलेला किस्सा आठवतो . प्रातिनिधिक आहे .
तर हा अभियंता गटाराचे काम मागायला पालिकेच्या संबंधित विभागाकडे गेला . त्याला कंत्राट मिळाले देखील . सायबाला त्याने सांगितले कि माझ्याकडे काहीच पैसे नाहीत . तुम्हीच आगावू रक्कम दद्या . सायबाने रक्कम दिली . आणि अमुक तमुक बार मध्ये दोघे आणि ती रक्कम असे तिघे गेले .

मद्य ,डान्स ,बारबाला या चक्रात सायबाने सर्व आगावू रक्कम उडवून टाकली . हा अभियंता काहीच म्हणाला नाही . हाच त्याचा खंबीर स्वभाव सायबाला आवडला . म्हणाला,' उद्या बरोबर दहा वाजता ऑफिस मध्ये ये . कंत्राटाची सर्वच रक्कम घेवून टाक . . आणि काम सुरु कर . घरी जायला पैसे आहेत का ? नाही हे घे ५०० ची नोट . काळजी करू नको . शांत जाऊन झोप घरी ! '

---------

विश्वास . । ( रविवारीय लघु कथा )

विश्वास . । ( रविवारीय लघु कथा )

एक मित्र आहे .

एका प्रतिष्ठेच्या ठिकाणी वाद होवून स्वभिमानापायी राजीनामा दिला . माझा अगदी लांबून कधी तरी त्याच्याशी संबंध येत असे.मग हळू हळू सर्वांपासून हा लांब गेला . मी कुतूहल म्हणून संपर्क ठेवला .

हा गायबच असायचा.

कधी एफ बी ,कधी एस एम एस ,कधी भेट असा उगाचच संपर्क ठेवला .

वर्षभरात सगळेच त्याला विसरले .
मी मुद्दाम संपर्क ठेवून होतो .

एकदा रात्री भेटला . त्याच्या वेदनांनी मलाच कसेसे झाले .

तो म्हणाला ,' तुम्ही का मैत्री केलीत माझ्याशी ? का चांगुलपणा दाखवता ? तुम्ही ज्या जातीतले आहात ,त्या जातीत माझी कधीच मैत्री झाली नाही आणि होणार पण नाही . अपवाद तुम्हीच . हे सगळे का केलेत ?

मी हसलो .

म्हणालो ,' अरे मित्रा ,तू तिरीमिरीत गायब झालास . जगावरच रुसलास . बरयाच जणांशी तू संबंध तोडलेस ,अनेकांनी तुझ्याशी संबंध तोडले . हळूहळू तू नजरेआड गेलास . अशा वेळी माणूस जगावर उखडलेला असतो . त्याच्यातील सूडबुद्धी जागी होते . आणि तो कोणावरही ,कशासाठीही सूड उगवू लागतो . अगदी स्वतावरही !

हे होत असताना सगळे जग ,माणसे वाईट आणि स्वार्थी असतात असे वाटत राहते . माणसे वाईट असतात असा ग्रह झाला असता तरी मला चालले असते ,पण माणुसकीवरचा तुझा विश्वासच उडाला असता तर ते मला चालले नसते . . म्हणून मी तुझ्याशी संपर्क ठेवत गेलो

(आणि मग रस्त्यावरच्या रस्त्यावरची पहाट आणखी उजळत गेली ! )

चिकणमाती चा बेंदूर … तो बेंदूर !

आठव कथा  :चिकणमाती  चा बेंदूर … तो बेंदूर !
-----------------------------------------------

मस्त झिम्माड पाऊस पडतोय .
अशा आषाढी पावसात कुठे असायला हवे होते माहिताय ?

जावळीच्या डोंगरात ,पाचगणीच्या पायथ्याशी असलेल्या आमच्या आजोळी खर्शी ला आणि हातगेघर ला !

घोटा भर चिखलात पाय रुतविल्याशिवाय कोठेही जाता येणार नाही ,आणि कोणत्याही दिशेला पाहिले तरी धुक्यात बुडालेल्या डोंगराशिवाय काही दिसणार नाही ,ओढे -नदी ,पाट ,पाणी भरलेली शेती अशी 'शिण शिणरी ' तिथे होती . .

शेतात बैल ,औत ,कुळव यांच्या मागे मागे शेपटाप्रमाणे आम्ही जायचो . . (एकदा कुळ्वावर बसलेलो असताना खाली पडून माझ्या अंगावरून कुळव सहीसलामत पुढे गेलेला आजही आठवतोय !

पोरांचे पावसाळी उद्योग म्हणजे डोंगरात ,शेताच्या बांधावर माती शोधून कुठे चिकण माती बेन्दराचा बैल करायला मिळतेय का हे पाहणे . तशी मिळाली कि मग बैल जोडी करून त्याला काडीने डोळे वगेरे जिवंतपणा आणायचा .

त्यातही आमचा विशेष जीव असायचा पिवळी चिकणमाती शोधायचा ! ती तशी मिळाली कि त्यातून घडणारे बैल पिवळ्या रंगाचे असायचे . .

आज बेंदूर आहे . .

तस्साच येडा पाउस पडतोय ,मस्त कुंद धुंध वातावरण आहे . .

लहानपणीचे मैतर शहराच्या ' ट्रापिक' च्या गर्दीत कुठे दिसताहेत का पाहतोय ,'शेर ' गावात शिल्लक डोंगरात चिकणमाती शोधायला मिळेल का ,विचार करतोय ,आपल्या हाताने घडविलेल्या बैल जोडीला ठेवायला भिंतीत 'देवळी ' सापडेल का पाहतोय . .

कुठे हरवले यार हे सारे ?

कुठे हरवले ते निरागस दिवस ?

ती चिकणमाती,ते बैल,

तो बेंदूर !

Monday, July 8, 2013

दिसतोय तो फक्त धूर . .

  • .सातारा ,एम रमजू ,फोटोंचा धूर . ,अश्रू आणि मी !

    सातारा सोडला … उसको बहोत साल हुए । साताऱ्यात जी आश्चर्ये पाहिली ,त्यात एम रमजू (फोटो ग्राफर) हे एक आश्चर्य होते . एस टी वर्कशोप मध्ये काम करणाऱ्या या माणसाचा डोळा क्यामेरयाला लागला आणी जणू चमत्कारच झाला . बाळासाहेब देसाई ते बाळासाहेब ठाकरे असा कॅनवास त्यांनी लीलया पेलला . आयरिश स्कॉलर सारखे उंच ताडमाड ,डीसेण्ट आणी ऋजू व्यक्तिमत्व असलेले रमजू बघता बघता सातारकर पत्रकारांच्या गळ्यातील ताईत बनले . हि आख्यायिका १ ९ ६ ० सालापासूनची आहे . आज रमजू ७ ३ हून अधिक वयाचे आहेत .

    सातारा जिल्ह्यात अपघात झाला तर यमाआधी त्याची खबर रमजू ना लागायची !

    रमजू हातातील काम सोडून अपघात स्थळी पोहोचायचे . . फोटो काढून ऐक्य पासून इतर सर्व नव्या पेपर ला पोहोचवायचे . नवा -जुना भेदभाव न करता . अशा खबर मिळवायचे त्यांचे खास नेटवर्क होते . अपघात हा बीट त्यांनी पत्रकार नसताना एक हाती सांभाळला .

    तेव्हा डिजिटल प्रकार नव्हता . रमजू अचूक फ्रेम द्यायचे . उपसंपादक -संपादकांची टाप नसायची त्यांच्या फ्रेम पुढे 'इमेजीन ' करायची !

    स्वच्ह दाढी करून ,सुंदर कपडे घालून ,लाल बुंद रमजू ,स्कूटर ताबडत कुठे कुठे फोटो काढत फिरायचे . . किती बिले निघायची . . हे देव ,पेपर आणी रमजुना माहित असायचे . . साऱ्या गोष्टी त्यांच्या डार्क रूम मध्ये बंदिस्त !

    रमजूंची ची स्कूटर पिवळी झार रंगाची असायची . गर्दीत कोठेही ,कोणीही ओळखून आपल्याला 'मिशन ' साठी मार्ग काढून द्यावा ,यासाठी असलेली हि त्यांची युक्ती . कधी तरी त्यांनीच सांगितलेले . ( आता पीय़ाझीओ पासून कोणतीही पिवळी गाडी दिसली कि रमजूंची आठवण हमखास ! )

    माहिती कार्यालयाचे दौरे ,राजकीय सभा ,पूर ,अपघात ,भूकंप . . त्यांना काहीच वर्ज्य नसायचे . . साताऱ्यात ,बाळासाहेब देसाई . . राजमाता सुमित्राराजे भोसले . . इथपासून प्रतापराव भोसले ,नरेंद्र दाभोलकर असण्याचा काळ तर त्यांचाच होता .

    पण ,अभयसिंहराजे भोसले ,शिवेंद्र राजे ,मदन भोसले ,उदयन राजे ,शंभूराजे देसाई ,वगेरे काळ पण त्यांचाच होता .

    एकदा ,सोनिया गांधींची भोर मधील सभा 'कव्हर ' करायला मदन भोसले यांच्या वतीने रमजू आणी मी दोघेच गेलो . . पावसात झालेली सभा . . महाराष्ट्रातील पहिली सभा . ,. इरकली साडी नेसलेल्या सोनियांना 'फ्रेम बद्ध ' करण्यात रमजुनी काय बाजी लावली ,हे पाहिले !

    रमजू कोणत्याही विचारांचे नव्हते . . पत्रकारांचे दोन गट पडले तरी रमजू कोणत्या गटात टाकून त्यांना धर्म संकटात टाकू नये ,अशी दोन्ही गटांची इच्छा असायची .
    रमजू हा एक डोळा होता . . त्यांच्या ' फ्रेम ' मधून काहीही न सोडणारा . .

    पत्रकार 'श्रम परिहार ' करत असले कि ,पोरांचा दंगा पाहणाऱ्या कृतार्थ बापासारखे स्थितप्रद्न्य असायचे ते . . कोणत्याही पेल्यात -गोटात ते नसायचे . . खूप कमी बोलायचे . . त्यांना काय बोलायचे होते . . हे त्यांचे फोटो पाहिल्यावर कळायचे !

    गेले काही महिने त्यांची आठवण येत होती . . मी चौकशी करीत असायचो . . साताऱ्यातील 'तिसरा राजा ' असलेला माझा पत्रकार मित्र राजेंद्र त्रिगुणे चे एक दिवस (परवाच ) सटासट मिस कॉल आले . . उत्साहाने भरलेला 'राजा ' म्हणाला ,'मी रमजू कडे आलो आहे ,
    बोला ' त्यांच्याशी !

    डोळे लकाकले ! लेक टेपिंग -जिलेटीन स्फोट -राजकीय हत्या सारे 'सीन ' डोळ्यासमोर उभे राहिले . . या साऱ्यात स्वताची काहीच भूमिका ,मत नसलेले पण इतिहास प्रामाणिकपणे फ्रेम बद्ध ' करणारे रमजू ,अगदी लाल बुंद डोळ्यासमोर उभे राहिले !

    त्यांच्याशी काय बोललो कळलेच नाही .

    बाहेर आल्यावर राजा ' ने सांगितले . रमजू रिटायर झालेत . . मागेच त्यांनी बर्याच फोटो आणी फिल्म्स त्यांनी जाळून टाकल्यात . .,सलग १ ५ दिवस हि 'जाळ पोळ ' चालू होती . . प्राण पणाने ,जीवाची बाजी लावून काढलेले किती तरी फोटो भस्मसात झाले असणार . . किती शिल्लक आहेत हे विचारायचे धाडस अंगात नाही माझ्या . .

    दिसतोय तो फक्त धूर . . आणी रमजू चा लाल बुंद चेहरा . . कदाचित कोणाच्याच क्यामेरयात न आलेला . .