Wednesday, November 13, 2013

लक्ष्मीपूजन ३ :

'प्रबोधन माध्यम ' चे कार्यालय खूप वर्षे एकाच ठिकाणी आहे (सुदैवाने ) . . पण बरीच वर्षे त्याला रंग द्यायला जमला नव्हता . काही दिवसापूर्वी अंगात काही संचारल्यासारखे झाले आणि
एका कार्यालयीन सहकाऱ्याला बरोबर घेवून रविवारी स्वताच्या हाताने कार्यालयाला रंग देवून टाकला !

आज त्या रंगारंग कार्यालयात लक्ष्मीपूजन करताना सजलेल्या भिंती हळूच गालात हसत आल्याचा भास झाला . .

लक्ष्मीपूजन म्हणजे फक्त चलनात असलेल्या संपत्तीची पूजा नव्हे .

लक्ष्मीपूजन !
------------------

लक्ष्मीपूजन करण्याची माझी एक वेगळीच पद्धत आहे . . लक्ष्मीपूजन म्हणजे फक्त चलनात असलेल्या संपत्तीची पूजा नव्हे . . माझ्या कडे चलनात असलेली आणी नसलेली वेगवेगळी नाणी आहेत . . छंद म्हणून जमवलेली !

महाराजांचा होन आहे ,ब्रिटीश नाणी -नोटा आहेत ,त्याच प्रमाणे स्विस आणी इतर देशांचे कॉईन आहे . . मी नेपाळ ,भूतान आणी काश्मीर लगत पाक सीमेवर ,चीन सीमेवर जावून आलो आहे . . पण त्या पलीकडे परदेशात गेलो नाही . . पण परदेशात कोणी
मित्र -नातेवाईक गेले कि मी आवर्जून त्या देशाची एक -दोन नाणी मिळवतो ! त्याचा बरा संग्रह झाला आहे . .

आणी त्यात आणे ,पैसे ,रुपये अशी खूप जुनी नाणी आहेत । खेडे गावात एकट्या राहणाऱ्या माझ्या आईच्या आत्याच्या निधना नंतर मला घरात सापडलेली . . खूप लहानपणापासून आजही मी ती जपून ठेवलीत.
.
त्या नन्तर बारा -पंधरा घरे बदलून सुद्धा हा ठेवा मी जपला आहे

माझ्या पूर्वजांची इष्टेट आहे ती ! लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मी ती हातात घेतो ,त्यांना न्हावू घालतो ,हृदयाशी धरतो . . पूजा करतो . . आणी हळूच त्यांच्या आशीर्वादाच्या कुशीत शिरू पाहतो. .

तमाच्या तळाशी दिवे लागले !

तमाच्या तळाशी दिवे लागले !
.........................................

. . नॉक औट व्हावे इतके ४ महिन्यांचे काम संपवून आज . रात्री लक्ष्मी पूजनानंतर माझ्या मित्राबरोबर आणि त्याच्या रिक्षा वाल्या मित्राबरोबर जेवायला बसलो . .

तेवढ्यात गौरी चा फोन आला . . आपण ज्या दिवंगत रिक्षा वाल्या मित्राला खूप मदत केली होती ,त्यांच्या पत्नीचा फोन आला होता आणी . . त्या आपल्या घरी दिवाळीची गिफ्ट पाठवत आहेत . .
ऐकून अक्षरश : भडभडून आले . . आपण दिवाळी कुठे पोहोचवली आणि कुठे उगवून आली . . काहीच कळेना . .

तमाच्या तळाशी ,,तळा गाळाच्या तळाशी ...दिवे लागतात तीच खरी दिवाळी . . I SWEAR

Sunday, September 8, 2013

देवा श्री गणेशा ! (Prayer With my New Deaf and Dumb friends )


देवा श्री गणेशा ! (Prayer With my New Deaf and Dumb friends )
---------------------
गणेश हा सर्व विद्यांचा अधिपती आहे . . पण माझ्या या नव्या मित्रांना परिस्थिती -निसर्ग आणि असलाच तर देवाने मूक -बधिर अवस्थेत जगणे दिले आहे .

हे मित्र रोज मला एस पी कॉलेज मैदानावर भेटतात ,

मी एविनिंग वॉक घेत असतो . ते त्यांच्या खुणांच्या भाषेत मस्त गप्पा हाणत असतात एकमेकांशी . हसतात . भेटतात .

एक कट्टा . . एक विश्व आहे त्यांचे . तेथेच रुइआ मूक बधिर विद्यालय आहे . . तेथील विद्यार्थी /माजी विद्यार्थी असावेत .

आज त्यांच्या नुसत्या गप्पा न्हवत्या . . तर ते चक्क गणपती बाप्पाचे सुरेख चित्र रेखाटत होते . . मी फोटो काढायला गेलो तर ,ते लाजून आधी सर्व जण फ्रेम मध्ये येतच नव्हते .

मी जमवून आणले . .

पण त्यांची नावे कळली नाहीत कारण त्यांची साईन लेन्ग्वेज मला कळत नव्हती ( मला खासदार वंदना चव्हाण आठवल्या . त्या मूक -बधिर व्यक्तींशी कामापुरते साईन लेन्ग्वेज मध्ये बोलू शकतात ! आपल्याला पण हे जमायला हवे असे अशा वेळी वाटते

)आणि माझ्याकडे पेन -कागद नव्हता .
पण ते छान हसत -दिसत होते . .

त्यातच मी हरवून गेलो .

माझ्या नव्या मित्रांची नवी अदाकारी ,भक्ती ,श्रद्धा मनापासून पहिली त्यांनी ,हसत -खेळत काढलेल्या बाप्पाला नमस्कार केला

त्यांचा या जीवनातील आनंद चिरकाल टिको ,वाढो ,अशी प्रार्थना केली !

अजून काय पायजे आपल्याला ?

सर्वाना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा !

Sunday, July 21, 2013

डान्स बार (लघु )कथा :

डान्स बार (लघु )कथा :

डान्स बार बंदी न्यायालयात टिकली नाही . पुन्हा बार सुरु होणार असे म्हटले जात आहे . एका तरुण अभियंत्याने डान्स बारचा त्या काळात सांगितलेला किस्सा आठवतो . प्रातिनिधिक आहे .
तर हा अभियंता गटाराचे काम मागायला पालिकेच्या संबंधित विभागाकडे गेला . त्याला कंत्राट मिळाले देखील . सायबाला त्याने सांगितले कि माझ्याकडे काहीच पैसे नाहीत . तुम्हीच आगावू रक्कम दद्या . सायबाने रक्कम दिली . आणि अमुक तमुक बार मध्ये दोघे आणि ती रक्कम असे तिघे गेले .

मद्य ,डान्स ,बारबाला या चक्रात सायबाने सर्व आगावू रक्कम उडवून टाकली . हा अभियंता काहीच म्हणाला नाही . हाच त्याचा खंबीर स्वभाव सायबाला आवडला . म्हणाला,' उद्या बरोबर दहा वाजता ऑफिस मध्ये ये . कंत्राटाची सर्वच रक्कम घेवून टाक . . आणि काम सुरु कर . घरी जायला पैसे आहेत का ? नाही हे घे ५०० ची नोट . काळजी करू नको . शांत जाऊन झोप घरी ! '

---------

विश्वास . । ( रविवारीय लघु कथा )

विश्वास . । ( रविवारीय लघु कथा )

एक मित्र आहे .

एका प्रतिष्ठेच्या ठिकाणी वाद होवून स्वभिमानापायी राजीनामा दिला . माझा अगदी लांबून कधी तरी त्याच्याशी संबंध येत असे.मग हळू हळू सर्वांपासून हा लांब गेला . मी कुतूहल म्हणून संपर्क ठेवला .

हा गायबच असायचा.

कधी एफ बी ,कधी एस एम एस ,कधी भेट असा उगाचच संपर्क ठेवला .

वर्षभरात सगळेच त्याला विसरले .
मी मुद्दाम संपर्क ठेवून होतो .

एकदा रात्री भेटला . त्याच्या वेदनांनी मलाच कसेसे झाले .

तो म्हणाला ,' तुम्ही का मैत्री केलीत माझ्याशी ? का चांगुलपणा दाखवता ? तुम्ही ज्या जातीतले आहात ,त्या जातीत माझी कधीच मैत्री झाली नाही आणि होणार पण नाही . अपवाद तुम्हीच . हे सगळे का केलेत ?

मी हसलो .

म्हणालो ,' अरे मित्रा ,तू तिरीमिरीत गायब झालास . जगावरच रुसलास . बरयाच जणांशी तू संबंध तोडलेस ,अनेकांनी तुझ्याशी संबंध तोडले . हळूहळू तू नजरेआड गेलास . अशा वेळी माणूस जगावर उखडलेला असतो . त्याच्यातील सूडबुद्धी जागी होते . आणि तो कोणावरही ,कशासाठीही सूड उगवू लागतो . अगदी स्वतावरही !

हे होत असताना सगळे जग ,माणसे वाईट आणि स्वार्थी असतात असे वाटत राहते . माणसे वाईट असतात असा ग्रह झाला असता तरी मला चालले असते ,पण माणुसकीवरचा तुझा विश्वासच उडाला असता तर ते मला चालले नसते . . म्हणून मी तुझ्याशी संपर्क ठेवत गेलो

(आणि मग रस्त्यावरच्या रस्त्यावरची पहाट आणखी उजळत गेली ! )

चिकणमाती चा बेंदूर … तो बेंदूर !

आठव कथा  :चिकणमाती  चा बेंदूर … तो बेंदूर !
-----------------------------------------------

मस्त झिम्माड पाऊस पडतोय .
अशा आषाढी पावसात कुठे असायला हवे होते माहिताय ?

जावळीच्या डोंगरात ,पाचगणीच्या पायथ्याशी असलेल्या आमच्या आजोळी खर्शी ला आणि हातगेघर ला !

घोटा भर चिखलात पाय रुतविल्याशिवाय कोठेही जाता येणार नाही ,आणि कोणत्याही दिशेला पाहिले तरी धुक्यात बुडालेल्या डोंगराशिवाय काही दिसणार नाही ,ओढे -नदी ,पाट ,पाणी भरलेली शेती अशी 'शिण शिणरी ' तिथे होती . .

शेतात बैल ,औत ,कुळव यांच्या मागे मागे शेपटाप्रमाणे आम्ही जायचो . . (एकदा कुळ्वावर बसलेलो असताना खाली पडून माझ्या अंगावरून कुळव सहीसलामत पुढे गेलेला आजही आठवतोय !

पोरांचे पावसाळी उद्योग म्हणजे डोंगरात ,शेताच्या बांधावर माती शोधून कुठे चिकण माती बेन्दराचा बैल करायला मिळतेय का हे पाहणे . तशी मिळाली कि मग बैल जोडी करून त्याला काडीने डोळे वगेरे जिवंतपणा आणायचा .

त्यातही आमचा विशेष जीव असायचा पिवळी चिकणमाती शोधायचा ! ती तशी मिळाली कि त्यातून घडणारे बैल पिवळ्या रंगाचे असायचे . .

आज बेंदूर आहे . .

तस्साच येडा पाउस पडतोय ,मस्त कुंद धुंध वातावरण आहे . .

लहानपणीचे मैतर शहराच्या ' ट्रापिक' च्या गर्दीत कुठे दिसताहेत का पाहतोय ,'शेर ' गावात शिल्लक डोंगरात चिकणमाती शोधायला मिळेल का ,विचार करतोय ,आपल्या हाताने घडविलेल्या बैल जोडीला ठेवायला भिंतीत 'देवळी ' सापडेल का पाहतोय . .

कुठे हरवले यार हे सारे ?

कुठे हरवले ते निरागस दिवस ?

ती चिकणमाती,ते बैल,

तो बेंदूर !

Monday, July 8, 2013

दिसतोय तो फक्त धूर . .

  • .सातारा ,एम रमजू ,फोटोंचा धूर . ,अश्रू आणि मी !

    सातारा सोडला … उसको बहोत साल हुए । साताऱ्यात जी आश्चर्ये पाहिली ,त्यात एम रमजू (फोटो ग्राफर) हे एक आश्चर्य होते . एस टी वर्कशोप मध्ये काम करणाऱ्या या माणसाचा डोळा क्यामेरयाला लागला आणी जणू चमत्कारच झाला . बाळासाहेब देसाई ते बाळासाहेब ठाकरे असा कॅनवास त्यांनी लीलया पेलला . आयरिश स्कॉलर सारखे उंच ताडमाड ,डीसेण्ट आणी ऋजू व्यक्तिमत्व असलेले रमजू बघता बघता सातारकर पत्रकारांच्या गळ्यातील ताईत बनले . हि आख्यायिका १ ९ ६ ० सालापासूनची आहे . आज रमजू ७ ३ हून अधिक वयाचे आहेत .

    सातारा जिल्ह्यात अपघात झाला तर यमाआधी त्याची खबर रमजू ना लागायची !

    रमजू हातातील काम सोडून अपघात स्थळी पोहोचायचे . . फोटो काढून ऐक्य पासून इतर सर्व नव्या पेपर ला पोहोचवायचे . नवा -जुना भेदभाव न करता . अशा खबर मिळवायचे त्यांचे खास नेटवर्क होते . अपघात हा बीट त्यांनी पत्रकार नसताना एक हाती सांभाळला .

    तेव्हा डिजिटल प्रकार नव्हता . रमजू अचूक फ्रेम द्यायचे . उपसंपादक -संपादकांची टाप नसायची त्यांच्या फ्रेम पुढे 'इमेजीन ' करायची !

    स्वच्ह दाढी करून ,सुंदर कपडे घालून ,लाल बुंद रमजू ,स्कूटर ताबडत कुठे कुठे फोटो काढत फिरायचे . . किती बिले निघायची . . हे देव ,पेपर आणी रमजुना माहित असायचे . . साऱ्या गोष्टी त्यांच्या डार्क रूम मध्ये बंदिस्त !

    रमजूंची ची स्कूटर पिवळी झार रंगाची असायची . गर्दीत कोठेही ,कोणीही ओळखून आपल्याला 'मिशन ' साठी मार्ग काढून द्यावा ,यासाठी असलेली हि त्यांची युक्ती . कधी तरी त्यांनीच सांगितलेले . ( आता पीय़ाझीओ पासून कोणतीही पिवळी गाडी दिसली कि रमजूंची आठवण हमखास ! )

    माहिती कार्यालयाचे दौरे ,राजकीय सभा ,पूर ,अपघात ,भूकंप . . त्यांना काहीच वर्ज्य नसायचे . . साताऱ्यात ,बाळासाहेब देसाई . . राजमाता सुमित्राराजे भोसले . . इथपासून प्रतापराव भोसले ,नरेंद्र दाभोलकर असण्याचा काळ तर त्यांचाच होता .

    पण ,अभयसिंहराजे भोसले ,शिवेंद्र राजे ,मदन भोसले ,उदयन राजे ,शंभूराजे देसाई ,वगेरे काळ पण त्यांचाच होता .

    एकदा ,सोनिया गांधींची भोर मधील सभा 'कव्हर ' करायला मदन भोसले यांच्या वतीने रमजू आणी मी दोघेच गेलो . . पावसात झालेली सभा . . महाराष्ट्रातील पहिली सभा . ,. इरकली साडी नेसलेल्या सोनियांना 'फ्रेम बद्ध ' करण्यात रमजुनी काय बाजी लावली ,हे पाहिले !

    रमजू कोणत्याही विचारांचे नव्हते . . पत्रकारांचे दोन गट पडले तरी रमजू कोणत्या गटात टाकून त्यांना धर्म संकटात टाकू नये ,अशी दोन्ही गटांची इच्छा असायची .
    रमजू हा एक डोळा होता . . त्यांच्या ' फ्रेम ' मधून काहीही न सोडणारा . .

    पत्रकार 'श्रम परिहार ' करत असले कि ,पोरांचा दंगा पाहणाऱ्या कृतार्थ बापासारखे स्थितप्रद्न्य असायचे ते . . कोणत्याही पेल्यात -गोटात ते नसायचे . . खूप कमी बोलायचे . . त्यांना काय बोलायचे होते . . हे त्यांचे फोटो पाहिल्यावर कळायचे !

    गेले काही महिने त्यांची आठवण येत होती . . मी चौकशी करीत असायचो . . साताऱ्यातील 'तिसरा राजा ' असलेला माझा पत्रकार मित्र राजेंद्र त्रिगुणे चे एक दिवस (परवाच ) सटासट मिस कॉल आले . . उत्साहाने भरलेला 'राजा ' म्हणाला ,'मी रमजू कडे आलो आहे ,
    बोला ' त्यांच्याशी !

    डोळे लकाकले ! लेक टेपिंग -जिलेटीन स्फोट -राजकीय हत्या सारे 'सीन ' डोळ्यासमोर उभे राहिले . . या साऱ्यात स्वताची काहीच भूमिका ,मत नसलेले पण इतिहास प्रामाणिकपणे फ्रेम बद्ध ' करणारे रमजू ,अगदी लाल बुंद डोळ्यासमोर उभे राहिले !

    त्यांच्याशी काय बोललो कळलेच नाही .

    बाहेर आल्यावर राजा ' ने सांगितले . रमजू रिटायर झालेत . . मागेच त्यांनी बर्याच फोटो आणी फिल्म्स त्यांनी जाळून टाकल्यात . .,सलग १ ५ दिवस हि 'जाळ पोळ ' चालू होती . . प्राण पणाने ,जीवाची बाजी लावून काढलेले किती तरी फोटो भस्मसात झाले असणार . . किती शिल्लक आहेत हे विचारायचे धाडस अंगात नाही माझ्या . .

    दिसतोय तो फक्त धूर . . आणी रमजू चा लाल बुंद चेहरा . . कदाचित कोणाच्याच क्यामेरयात न आलेला . .

Monday, May 27, 2013

अकल्पित गोष्टी -अनपेक्षित भीती !

अकल्पित गोष्टी -अनपेक्षित भीती !
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सकाळची वेळ होती . मी नेहमीप्रमाणे चालत होतो

समोरून दोन मुलांना बसवून एक मध्यमवयीन मनुष्य झुमकन बाइक चालवत आला . . तो मला क्रॉस करून जाणार तेवढ्यात त्याच्या तोंडावर काही वस्तू आदळणार असे त्याला वाटले ।

तो गडबडला आणि बाइक वरून मुलांसह पडता पडता वाचला . .

ती वस्तू मी आधीच पाहिली होती . काळ्याभोर रंगाचे गरीब फुलपाखरू होते ते . . मस्त रमत गमत ,न ठरलेल्या मार्गावर विहरत होते

खरेतर हा माणूस त्याच्या मार्गावर आडवा आला . . तरी फुलपाखरू घाबरले नाही . स्वताची लय बिघडू न देत ते जिकडे जायचे तिकडे निघून गेले

मी विचार करत बसलो . . अनपेक्षित समोर येणाऱ्या गोष्टीना माणूस का घाबरतो ?

फुलपाखरू म्हणजे काही दगड गोटाच आपल्या कपाळावर येउन पडत आहे ,असा भास त्या माणसाला का झाला ?

अनपेक्षित गोष्टींबद्दल कसली अनामिक भीती त्याच्या मनात दडली होती ?

अनपेक्षित गोष्टी कपाळ मोक्ष करतील कशावरून ?

अनपेक्षित गोष्टी अनपेक्षित आनंद सुद्धा देतील कदाचित ,हे कळायला हवे

पण त्यासाठी मनात दडलेल्या भीतीवर मात तर करायला हवी !

लढणाऱ्या माणसातील ' माणूसपण '

लढणाऱ्या माणसातील ' माणूसपण '

महाराष्ट्रात काम करणारे नितीन (भाऊ ) गडकरी अचानक भाजपा चे राष्ट्रीय अध्यक्ष झाले तेव्हा महाराष्ट्राचा उर साहजिकच भरून आला.मलाही त्यांचे आकर्षण होतेच (कारण ते राज्यात मंत्री असताना त्यांच्या निवास स्थानी भल्या सकाळी खिचडी खात -खात त्यांची मुलाखत घेतली होती.. . रॉयल स्टोन ' ला बहुतेक . मी टेक्सी ने आलो आहे ,हे कळताच त्यांनी त्यांच्या ताफ्यातील एक गाडी मला सी एस टी पर्यंत सोडायला दिली होती . इतकी बारीक काळजी घेणारा हा नेता आहे ) .

ते भाजपा अध्यक्ष झाल्यावर त्यांच्या दिल्ली निवास स्थानी भेटण्याची संधी मिळेल असे वाटले नव्हते .पण त्यांना वैद्यकीय सल्ला देणारे डॉक्टर हे माझे मित्र आहेत.ते मला गडकरी भेटीला घेवून गेले...गडकरी राहायचे त्या इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून दिल्ली हिरवी आणी छान दिसते.स्थानिक वाहिन्यांचे प्रतिनिधी ,राज्यातील नेते...अशी गर्दी होती.सर्वांचे खाणे ,सरबराई चालू होतीच.गडकरी यांच्या २-३ राज्यातील दौरे आणी एका नेत्याच्या घरच्या लग्नाला जायची तयारी चालू होती. डॉक्टरबरोबर गडकरी यांना नंतर भेटण्याच्या दोन -तीन वेळा आल्या...एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष महणून मराठी माणसाची कारकीर्द यशस्वी व्हावी हीच सदिच्छा होती त्या वेळी !

२ ० ० ९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पुण्यात गरवारे महाविद्यालयात त्यांच्या मेळाव्याला अरविंद नाईक -दिलीप कांबळे मला घेवून गेले . उद्योग -सहकार -समाजकारण आणि राजकारण या सूत्रात कार्यकर्त्यांना तालुका पातळीवर कसे गुंफायचे याची विलक्षण ' थियरी ' ते सहजपणे मांडत होते .

आणि परवा ' डी एस के गप्पा ' मधील गडकरी थेट भिडणारे ,दिलखुलास होते .

पार्टीने तिकीट बदलावे लागल्याने गडकरी यांनी उमेदवारी दिलेल्या महिलेला परत बोलावून तो दुखद निरोप द्यायचा प्रसंग आला . तेव्हा ती महिला म्हणाली ,' नितीनभाऊ ,पार्टी म्हणतेय तर तसेच करा . हे तुम्ही दिलेले दहा हजार परत देते . मात्र त्यातील अडीच हजार प्रचारासाठी खर्च झाले आहेत ' ! ( अशा कार्यकर्त्यांच्या जीवावर पार्टी उभी आहे ,असे नितीन गडकरी सांगतात )

एकदा डॉ श्रीकांत जिचकार आणि गडकरी वीस वर्षापूर्वी महाराष्ट्र एक्स्प्रेस ने पुण्यात आले ,

तेव्हा गडकरींची सुटकेस घेण्याच्या सूचना जिचकारांनी त्यांच्या सहाय्यकाला दिल्या होत्या . ! ' तू कॉंग्रेस मध्ये ये .तुला आमदार करतो ' असे जिचकार म्हणाले . तेव्हा ' मी विष खाईन पण कॉंग्रेस मध्ये येणार नाही ,' असे नागपुरी उत्तर गडकरींनी दिले होते

त्याच वेळी शिवाजीनगर पुणे येथे श्रीधर माडगुळकर कॉंग्रेस च्या प्रचाराचा फलक लागला होता . त्यात 'दोन खासदार असलेल्या पक्षाने कॉंग्रेस ला काही शिकवू नये ' अशा स्वरूपाचा 'संदेश ' लिहिला होता . तो वाचून गडकरींना खूप दुक्ख झाले . त्याच पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष झाले !

कंत्राटदार मंडळीना कसे तिकीट देता ? कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचलत राहायचे का ?

या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले ,' मी सायकल रिक्षातून पक्षाचा प्रचार केलेला कार्यकर्ता आहे . आणि मी राष्ट्रीय अध्यक्ष झालो आहे . किमान मला तरी हा प्रश्न विचारू नका ! '

नागपुरात आम्ही चार जण एका मोटार सायकलीवर प्रचार करत फिरायचो ,तेव्हा चौथा कार्यकर्ता मागे बसून नंबरप्लेट दिसू नये म्हणून त्यावर हाथ ठेवायचा . असे दिवस होते . .

नक्षलवादी भागात गडकरी कसे मदतकार्य करतात आणि त्यांचे फोटो झोपडीत कसे लागले ले असतात ,हे त्यांनाच अधिकार्यांनी सांगितले . ' व्यवस्था जर न्याय देत नसेल ,कायदा जर न्याय देत नसेल ,तर तो फेकून द्यायला हवा ' असे त्यावर बिनदिक्कत पणे ' दबंग ' गडकरी सांगतात

एक्स्प्रेस वे झाला तेव्हा ते काम करणाऱ्या बड्या कंपन्यांच्या मालकाबरोबर १ ४ ० हून अधिक स्पीड ने गाडी चालवली जाइल ,त्यावेळी मी चहा पीत बसेन ,चहा सांडला तर याद राखा ' असे नागपुरी सावजी भाषेत मंत्री असलेले गडकरी ' क्वालिटी कंट्रोल ' बद्दल बजावतात ,तेव्हा घाम पुसण्याची पाळी इतरांची असते

' सिंगापूर चा जोईंट ' आणून चांगल्या दर्जाचा फ्लाय ओव्हर बांधणाऱ्या कंत्राटदाराने जेव्हा मंत्री नसलेल्या गड्करीना पूर्ण झालेले काम पाहण्यासाठी रात्री जाऊया . . तुम्ही येई पर्यंत मी हलणार नाही . असे सांगितले . निरुपाय झालेले गडकरी जातात ,चांगल्या कामाबद्दल त्याची पाठ थोपटतात . . तेव्हा तो दाक्षिणात्य कंत्राटदार म्हणतो ,' साब ,अच्छ काम करने के लिये ,

आपने इतनी बार मुझे गालीया दी . . और मै अच्छा काम करने लगा । उसी वक्त मैने दिसाइड कर लिया था ,कि जब तक आप पीठ पर हात रखते नही ,तब तक हटूगा नही '

कंत्राटदार आणि माजी मंत्री यात असा रुदय हेलावणारा संवाद होत असतो ,हे ऐकून आपण अवाक होतो . .

मी अनेक पूल बांधलेत ,राज आणि उद्धव यातील पूल बांधणे सगळ्यात अवघड आहे ,पण मला ते करायचे आहे ,असे बोलून ते सहजपणे पत्रकारांना बातमी पण देतात . माझ्याविरुद्ध कट रचला गेलाय . . मी त्यातून बाहेर पडेन . . मी लढणारा माणूस आहे '

हे गडकरी बोलतात ,तेव्हा लढणाऱ्या माणसातील ' माणूसपण ' केव्हाच आपल्या मनाला भिडलेले असते !

वाढ दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा ,नितीनभाऊ !

Friday, May 24, 2013

स्वप्नांचा मृत्यू…

रोज जमेल तसा मॉर्निंग वॉक घेतो. . . एस पी कॉलेज ग्राउंड वर पहाटे -सकाळी मस्त माहोल असतो. . आरोग्य महोत्सव असतो म्हणा न . उन्हाळा सुरु झाला आणि मुलांच्या परीक्षा संपल्या तेव्हा एक नवल पाहिले . . एका कोपऱ्यावर कोवळी मिसरूड फुटलेली गोड -सावळी मुले ताजी भाजी घेवून विकायला बसली होती . खूप काही घेवून उत्साहात . बरे वाटले . पण सकाळी खिशात पैसे घेवून फिरायची गरज नसल्याने भाजी त्यांच्याकडून घ्यायची राहिलीच .

पण त्यांना पाहिले . . त्यांचे काळे भोर डोळे पहिले , लगबग पाहिली कि आदित्य ची त्यांची मैत्री करून द्यायला हवी असे वाटायचे

एकदा आदित्य च लवकर उठला . . म्हणाला ' बाबा येतो मी फिरायला ' . मला बरे वाटले . खिशात पैसे घेतले . वॉक संपला तसे आदित्य ला पुढे करून त्या अश्राप मुलांकडून भरपूर खरेदी करायला लावली . आदित्य ने दहा रुपये जास्त पण दिले त्यांना . .

मग रोज मी त्यांना पाहायचो . . आदित्य ने त्यांच्या सोबत राहून ' समर जॉब ' केला पाहिजे . . असे स्वताला बजावायचो

अचानक कधी तरी ती मुले . . त्यांचे फुटपाथ वरचे भाजीचे प्रदर्शन दिसेना झाले

काळजाचा ठोकाच चुकला . .

त्यांच्या कोवळ्या धडपडीला ,उद्योजकतेला लगेच आणि पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी प्रयत्न थांबविला होता बहुतेक . .

किती गोड मुले होती. . किती बोलावेसे वाटायचे . . कोण ,कुठली . . का रस्त्यावर भाजी विकतात . . विचारावेसे वाटायचे . . पण नाही विचारले कधी

आता ती रिकामी जागा पाहिली की काळीज गलबलून येते . .

माणसाच्या मृत्यू पेक्षा त्याच्या स्वप्नांचा मृत्यू फार भयानक असतो

त्या पोरांनी कसे सोसले असेल ?
तीन लग्नांची गोष्ट !

अलीकडेच दोन लग्नांना जाण्याचा योग आला . . त्यातील एक लग्न होते . आणि एक लग्नानिमित्त केलेला समारंभ होता . . आणि एक तिसऱ्या लग्नातील वरात होती

पहिल्या लग्नात नवरदेवाचे मित्र इतका धुडगूस घालत होते कि बस. . त्यांनी सुरुवात नवरदेव घोड्यावरून देव दर्शन करायला जातो ।तिथुन केली . त्याला नाचात -धनगड धीन्ग्यात सहभागी करण्याच्या नावाखाली ते इतके त्याच्या अंगाला भिडले होते कि फक्त बलात्कार करायचाच बाकी होता . त्रासलेला नवरदेव काहीही करू शकत नव्हता . मग हे टवाळखोर लग्नाच्या वेळी त्याला अक्षता फेकून मारत होते .विधि-मंत्र सुरु असताना शेरेबाजी करत होते . सप्तपदीच्या वेळी ' ए जोरात नको पळू ' असे ओरडत होते . . हार गळ्यात घालू न देण्यासाठी नवरदेवाला उचलण्याचा 'आयटेम ' तर होताच . . मग २ ० जण होम सुरु असताना स्टेज वरच शेरेबाजी करत एन्जॉय करत बसले . . भटजींना पण त्यांनी काही सुचू दिले नाही . . जवळ जवळ ५ ० ० जणा समोर त्यांचा हैदोस सुरु होता . . .

दुसरा अनुभव भरत देसरडा यांच्या घरातील विवाहानिमित्त त्यांनी काही मदत सामाजिक कामाला देवू केली होती . ' दीनदयाळ शेतकरी विकास प्रकल्प ' (यवतमाळ) तर्फे विदर्भात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यापैकी ५ २ जणांच्या विधवाना उद्योजक बनवून स्वताच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत देण्याचा कार्यक्रम होता . माझे ज्येष्ठ मित्र विजय ठोंबरे यांनी आयोजित केला होता .

अतिशय हृदयस्पर्शी कार्यक्रम झाला . देसरडा कुटुंबातील नव दाम्पत्याने सामाजिक सामिलकी दाखवून संसाराला सुरुवात केली होती . .

त्या कार्यक्रमाच्या ठिकाणा बाहेर . . मात्र एक झोकदार वरात डी जे ,स्पिकर्स , नाच असे श्रीमंतीचे प्रदर्शन मिरवत चालली होती . . त्यांच्यापासून काही फुट अंतरावर एक सामाजिक सामिलकी ची संवेदनशील क्रांती घडत होती . . . ते त्यांच्या गावीही नव्हते !

अवाक मीच झालो . .

देव पण काय करामती आहे . .

एक वास्तव आणि एक स्वप्न . . एक आव्हान , एक प्रयत्न . . एक प्रश्न एक उत्तर . .

एकाच ठिकाणी,एकाच वेळी , दोन डोळ्यांना दाखवत असतो !
शोधता येत नसतो तो ।
.........................................

शोधता येत नसतो तो. . भेटतो . .
डायरेक्ट ।
थेट ,अकल्पित . . ध्यानी मनी नसताना . सिग्नल ला सुधा

मेगा ब्लॉक असला तरी . .

मेगा ब्लोक असला तरी त्याची ट्रेन येते धड धडत
आपल्याच रुळावरून . . आपल्याला धडकणार असे वाटत असताना
तो थांबवतो ।
आणि आपल्या ट्रेन ला ओढून नेतो . . थेट मस्त यार्डात

ड्युटी . . ऑफिस . ग़र्दि .घाम . . हळूच विसरायला लावतो
ए एम आय ,एफ एस आय ,अप्रेझल . . सारे फिझुल होवून जाते

त्याच्या डोळ्यात पाहतो आपण स्वप्ने भव्य शिश महालाची
त्याच्या हृदयात ऐकतो गाज समुद्राची

त्याचे ढग अलगद कोसळतात सरी होवून . . 'ताज ' च्या समोर 'गेट वे ' वर

डोंबिवली ऐवजी तो नेतो ,बोटीतून अलिबागला
चिंब पावसात मोबाईल रेंज नसताना

त्याचे धाडस असते भन्नाट ।
आपण फिदा होतो . . त्याच्या बेफिकिरी वर ,त्याच्या फकिरी वर

खिशात पैसे नसताना ,तो देतो गरम वाफाळता चहा आपल्या हातात
काही न बोलता चहावाला पण त्याला नीट कप स्वाधीन करतो

जसे आपण निमूट हृदय त्याला स्वाधीन केलेले असते न तसे

तो असतो एक चमत्कार . .
आपण फ्लेटफॉर्म वर असताना हळूच आपले डोळे मिटतो . .मागून येवून
आख्या मुंबईला तो सीन पाहण्यासारखा असतो

आपण लटकेच रागावतो ,खुदकन हसतो ,होतो लट्टू . .पुन्ह एकदा
पाहिलेली वाट , आलेला राग . .सारे विसरून ,विरघळून जातो . . त्याच्या खोट्या कारणात

तो असतो एक कवी कल्पना आपणच आतुर होवून केलेली

ती हाक असते आपणच आपल्याला घातलेली

आपलेच प्रेम त्याच्या रूपाने आलेले असते उफाळून
'तो ' निमित्तमात्र . . आपण व्यक्त होण्यासाठी

'तो ' निमित्तमात्र . . . आपण मुक्त होण्यासाठी !

Monday, April 15, 2013

सिग्नल



भर दुपारी उन्ह जाळ काढत असताना एका ठिकाणी निघालो होतो . मोठा सिग्नल होता .

हमखास भिकारी असतात तिथे .

सवयीने मी काही तरी काढून त्यांना देत असतोच . ( आणि बहुतेक वेळा मला माझ्या व्यवसायाची बिले काढताना 'या ' मंडळींचीच आठवण येत असते ! जो इतरांकडून पैसे घेतो ,तो याचकच असतो बहुतेक वेळा )

आज चित्र वेगळे होते .
सूर्य पेटलेला असताना एक काळी कभिन्न आणि अपंग जोडी भिक मागत होती . त्यातील पुरुष तरुणाच्या अंगावर पुरेसे कपडे हि नव्हते . काहीना किळस यावी . . काहीना कणव यावी अशी वेळ होती .
काही जण एखादे नाणे देत होते ,काही जण हुसकावून लावत होते .

दुचाकी वरून निघालेल्या पण सिग्नलला थांबलेल्या दोन तरुणांना त्यांनी भिक मागितली . आता ते कचकचीत शिवी हासडणार . . हाकलणार अशी माझी सवयीची समजूत होती

पण दुचाकीच्या मागे पाण्याची बाटली घेवून बसलेल्या तरुणाने काही न बोलता . . . त्या काळ्या कभिन्न दाम्पत्य अपंग वेडसर मूर्तीकडे शांत -कोऱ्या नजरेने नजरेने पाहिले

आणि दुसऱ्या क्षणी काही कळायच्या आत . .
ती थंड मृगजळ वाटणारी पाण्याची बाटली काळ्या कभिन्न वेडसर भिकारी दाम्पत्याच्या हातात त्या तरुणाने दिली होती !

सुखद धक्का होता मला . .

सूर्य ,उन्हे -दुष्काळ कितीही धगधगला तरी माणुसकीचा पाझर आटू न देणे ही किती दिलासा देणारी गोष्ट आहे ना ?

थोडीसी लिफ्ट . . .



दिवस धावपळीचा होता खरा . रात्री ९ च्या दरम्यान घरी परतू लागलो तर एका कोपऱ्यावर आजीबाई रिक्षा थांबवण्याचा अयशस्वी प्रयत्न करताना दिसल्या . त्यांच्या साध्या , अत्यंत गरीब सारख्या दिसणाऱ्या अवतारामुळे रिक्षा थांबत नव्हत्या . मी गाडी वळवून त्यांच्या पर्यंत जावू लागेपर्यंत त्या आणखी पुढे चौकात रिक्षा थांबवू पाहत होत्या . त्यांच्या जवळ गेलो . कार थांबवली .

'आजीबाई रिक्षा थांबणार नाही आता . माझ्या गाडीत चला . मी सोडतो तुम्हाला घरी .' असे मी म्हणून पाहिले .

आजीबाई लगेच बसल्या .'

पुढे पुलापाशी घर आहे माझे . तिथे जाउन अंडा बुर्जी गाडीचे सामान घेवून परत इथेच यायचे आहे . मुलगा भांडून गेला आहे . आज मलाच अंडा -बुर्जी गाडी सांभाळायला हवी ' आजी बाई बोलत्या झाल्या

त्यांच्या झोपडपट्टीत जाउन त्या किलो-दोन किलो चिरलेला कांदा ,भांडी ,तेल -तिखट वगेरे गाठोडे घेवून आल्या . कार मध्ये बसल्या .
मी बोलता राहून त्यांचा संकोच कमी केला . त्यांच्या बुर्जी गाडी जवळ कार थांबली आणि गुडघे दुखणाऱ्या सत्तरी तील आजीबाई चे गाठोडे उतरून दिले .

आजीबाई कांद्याचे गाठोडे घेवून पहिल्यांदाच कार मध्ये बसल्या असणार . . ' बाळा ,तुला २ ० रुपये देते ' असे म्हणाल्या .

मला चटकन माझी आजी आठवली .असेच लुगडे नेसून साधे राहून काही -बाही कष्ट करणारी . .

डोळ्यात पाणी आले ,म्हणालो ' आजी ,राहूद्या पैसे तुमच्याकडेच . मी एखाद दिवस येईन तुमची बुर्जी खायला '

आजीबाई गेल्या त्यांचे रहाट गाडगे चालवायला . आता १ २ वाजेपर्यंत त्या बुर्जी ची गाडी सांभाळणार . मग परत घरी कशा जाणार ? त्यांचा संघर्ष कधी संपणार ?

अनुत्तरीत प्रश्न,गाडीत चिरलेल्या कांद्याचा घमघमाट आणि माझ्या डोळ्यात पाणी उभे करून आजीबाई मार्गस्थ झाल्या

. . . मलाच नंतर माझा मार्ग कळेना .

Tuesday, March 26, 2013

बिलेटेड हेप्पी बर्थ  डे  ! मुख्य मंत्री साहेब उर्फ  ' बाबा ' !
आजोळी मेढ्यात (जावळी ) तालुक्यात शिकत असताना लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रेमला काकी चव्हाण म्हणजे पृथ्वीराज यांच्या मातोश्री ,यांचा एकदाच प्रचार दौरा व्हायचा .त्या वेळच्या कराड लोकसभा  मतदार संघात आम्ही मतदान करायचो .  नंतर बाबा आले . मग दिल्लीत बाबांबरोबर भेटी झाल्या .

रेसकोर्स रोड ला भल्या सकाळी त्यांच्या निवास स्थानी गेलो  कि टेनिस - बेडमिंटन  कोर्ट वरून येणारे बाबा दारात सुद्धा भेटायचे .

सोनिया गांधी यांच्या बद्दल मी कोणत्याही  मुलाखती -लेख देणार नाही असे सांगणारे बाबा दिल्लीत भेटायचे 

 एम  डी पी सी  आणि आम्ही आयोजित केलेल्या 'महाराष्ट्र  ५ ० ' या  राष्ट्रीय परिषदेत सुद्धा आले .नटरंग  ' हा सिनेमा  तेथे  त्यांच्या  समवेत  आम्ही पाहिला .  मुख्यमंत्री झाल्यावर मात्र भेटी कमी झाल्या आहेत . म्हणून काल शुभेच्छा राहून गेल्या .
उशिरा  का होईना बाबा आपल्या वाढ दिवसानिमित्त शुभेच्छा  !  आपल्या नेतृत्वाखाली राज्याची प्रगती झाली  कि नाही ,हे मला सांगता  येणार नाही ,पण महाराष्ट्राला मुख्य मंत्री पदाची एक आगळी  वेगळी कारकीर्द आपण दिली आहे ,यात शंकाच नाही .

.
प्रश्न पत्रिकेचे नाव :मराठी पाऊल पडते पुढे  अर्थात महाराष्ट्राची  ' वादग्रस्त ' प्रगती ! :

जोड्या जुळवा आणि कारणे ,क्रम तपासा

प्रश्न :कोणी कोणास का कोठे कशासाठी  मारले ?

विजेत्यास महाराष्ट्र दिनी ' हक्क भंग भूषण ' पुरस्कार

१.राम कदम -अबू आझमी - आमदार टू आमदार

२.  हर्षवर्धन जाधव - कन्नड(मराठवाडा ) चे पोलिस -पोलिस  टू आमदार 

३. क्षितीज ठाकूर आणि यशस्वी आमदार सहकारी -सचिन सूर्यवंशी -आमदार टू पोलिस
ज्या वाटेवर गेलो ,तिथे तुझी भेट नाही
ज्या शिवारात हिंडलो ,तिथे तुझे शेत नाही
रण  रणत्या उन्हात ,तुझ्याकडे जाणारा एकही मेघदूत  नाही
दिसले हजारो चेहरे ,एकातही तुझे रूप नाही !

Sunday, March 24, 2013


क्या स्वाद है जिंदगीका ! 

उन्हाळा म्हणजे काही ठरलेली कामे गृहिणी ना करावी लागतात . त्यातील मसाले तयार करण्याचे काम 'सौ ' जन्याने पूर्ण झाले आहे .

माझी पत्नी गौरी आणि तिची बहिण गायत्री यांनी दोन्ही घरी वर्ष भर पुरेल असा तिखट आणि गोडा मसाला करून 'साठे बाजी ' करून ठेवली आहे ! त्यातील कांदा लसूण मसाला हि माझी फेवरीट मसाला रेसिपी आहे .सारवलेल्या अंगणात लाल भडक मिरच्या ,तेल लेवून ,तड तड्त्या उन्हात मस्त पहुडल्या आहेत,अशी (न ) काढलेली फोटो फ्रेम माझ्या मनात अजून ताजी आहे .

डंका तून मिरच्या कांडप करण्यापासून ,कांदा परतणे ,खोबऱ्याच्या काचऱ्या तळणे ,लसूण परतणे ,गरम मसाला तयार करणे नंतर 'तिखट मिसळणे ' असे अशा अनेक प्रक्रियातून तयार झालेला हा जहाल तिखट कांदा लसूण मसाला सातारा पद्धतीने आमच्या कडे केला जातो .( शेवटी हे तिखट मिसळताना हाताची लाही -लाही होते !) आमची आई हा मसाला जावळी परिसरात शिकली … जावळी -साताऱ्याच्या भूमीचा झणझणीत स्वाद आम्ही लहानपणी अंगिकारला । ( काही स्वाद आणि संवेदना थेट आईच्या पोटातून घेवून आपण जन्माला येत असतो )

तो आमच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे . आणि आता आम्ही तो पुण्यातील 'गोड्या'' कुटुंबात पण लोकप्रिय केला आहे . चित्पावन गौरीशी प्रेम विवाह झाल्यावर आंबट -गोड चवीची गम्मत मी शिकलो आहे आणि झण झणित थरार गौरी शिकली आहे !कोणत्याही भाजी -आमटी ची चव या मसाल्याने तयार होते . भरली वांगी ,बटाटा रस्सा ,डाळ -कांदा ,पावटा ,घेवड्याची रस्सेदार आमटी आदी रेसिपी तर या कांदा लसूण मसाल्याशिवाय सिद्धीस जात नाहीत . गरम भाकरी बरोबर दही -चटणी हा मेन्यु तर 'खल्लास ' लागतो ।

पण माझ्या लहानपणी एका गरीब मित्राने ,डोंबारयाच्या झोपडीत शिळा भात -लाल कांदा लसूण मसाला एकत्र करून त्यात तेलाऐवजी पाणी टाकून,कालवून खायला शिकवले होते ! ( तेल जपून वापरायचे लोक .तेव्हा गोडे तेल ही ' प्रेशस कमोडीटी ' होती त्या कुटुंबाना … )
त्याची आठवण आली की भातात लाल कांदा -लसूण घेतो मी, सर्वांची नजर चुकवून त्यात थोडे पाणी तेला ऐवजी मिसळायला घेतो ।
हा तिखट कांदा मसाला लसूण खाताना डोळ्यात पाणी येते ,ते सारे तिखट पणामुळेच असते असे नाही . काही आठवणी पण त्यात 'मिसळलेल्या ' असतात . ..



हा मसाला तयार झाला हे ओळखण्याची खूण त्याचा दरवळ हि असते…. हा कांदा -लसूण मसाला उर्फ 'तिखट ' टेस्ट करताना जिभेवर थरार निर्माण झाला ,मेंदूत करंट निर्माण झाला … मनात झण झणित आनंद लहरी उठल्या आणि कानशिले गरम होवून तोंडाला पाणी सुटले की समजावे -बात बन गयी है !

'तिखट मिसळणे ' हा उत्सवच असतो. हा उत्सव सेलिब्रेट करण्यासाठी बटाटे वडे करण्याची नवी प्रथा मी आमच्या 'बिडकर ' घराण्याला सुरु करून दिली आहे !

वडे संपला कि कांदा लसूण मसाला करायला घ्यायचा आणि तो संपत आला कि वडे तळायला घ्यायचे !

क्या स्वाद है जिंदगी का !


 क्या स्वाद है जिंदगीका !

Monday, March 18, 2013




सी एम ई  आणि  मी !


वैद्यकीय क्षेत्रात एकदा ' डाकदर ' झाले कि आयुष्यभरचे शिक्षण झाले असे मानले जात नाही . सतत नव्या तंत्राचा अभ्यास करत राहावा लागतो . तशा काही परिषदा होतात . त्यांना सीएम ई म्हणतात . ' कनटीन्युईन्ग मेडिकल एजुकेशन ' ! काही   सी एम ई ना मी माध्यम संयोजक म्हणून उपस्थित राहिलो आहे . पत्रकारिता आणि जनसंपर्क या क्षेत्रात सुधा अशी सी एम ई असावी असे मला वाटते . नुसते वाटत नाही तर जिथे प्रशिक्षण घेण्याची  संधी मिळेल तिथे  मी हे  प्रशिक्षण घेतो देखील . (मार्केडय काटजू यांनी पत्रकारितेचे प्रशिक्षण अनिवार्य करण्याचे सुतोवाच केले आणि गदारोळ उठला होता . प्रत्यक्षात कोणत्याही शिक्षणाला कमी लेखू नये . सतत  शिकत राहावे . ज्ञान अद्ययावत करत राहावे . मी बी  एस्सी (डीष्टीन्क्षण ) ,डिप्लोमा इन कम्म्युनिकेशन अंड जर्नालिझम ( त्या वर्षी  सर्व प्रथम,कुलपती पुरस्कार ) असे शिक्षण  आणि पत्रकारितेतील  ३  नोकऱ्या झाल्यावर मराठीतून एम ए केले . (पुणे विद्यापीठ,प्रथम वर्ग  )

 नंतर पी एच  डी करण्याचा माझा बेत पुणे विद्यापीठाच्या जालीम प्रवेश परीक्षेने हाणून पाडला !

तरी वाटते अजून नवीन काही शिकावे . म्हणून प्रसार माध्यम -जनसंपर्क -ब्रेन्ड मेनेज्मेंत क्षेत्रात काही कार्यशाळा ,परिषद असेल तर  सी एम ई म्हणून शिकायची माझी तयारी असते . त्याला मी कनटीन्युईन्ग माध्यम एजुकेशन ( सी एम ई ) असे नाव दिले आहे !

चित्रपट निर्मिती क्षेत्र कळावे म्हणून मी चित्रपट निर्मिती विषयावरची सर्तीफिकेट कोर्स प्रमोद प्रभुलकर यांच्या अकादमीत पहिलाच वर्षी केला होता . चित्रपट निर्मितीमधील बारकावे त्या ७ दिवसात मस्त शिकायला मिळाले होते .
२ ० १ २ मध्ये विख्यात ब्रांड गुरु अलेक पदमसी यांच्या पुण्यातील कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी मला मिळाली . अलेक यांच्या 'डबल  लाइफ  ' या पुस्तकाची मी अक्षरश पारायणे केली आहेत . त्यातून मला एड अजेन्सी ,जाहिरात ,जनसंपर्क  आणि त्या  क्षेत्राबद्दल जे शिकायला मिळाले ते  इतरत्र कोठेच उपलब्ध नाही . मार्च २ ० १ २ मध्ये  मी अलेक पदमसी यांच्या कार्यशाळेत सहभागी झालो . अलेक यांना कधी आयुष्यात पाह्यला मिळेल असेही मला वाटले नव्हते ! अलेक तेव्हा त्याच्या क्लायंत कंपन्यांना देव  वाटायचा .
कार्यशाळेचा ' बातमी सारांश '
'विश्वासार्हता हेच 'ब्रांड ' चे दुसरे नाव आहे असे मत प्रख्यात 'ब्रांड गुरु ,जाहिरात गुरु ' अलेक पदमसी यांनी  व्यक्त केले.अल्लाना इंस्तीतुत ऑफ मनेजमेंट सायन्स तर्फे आयोजित 'ब्रांड -जाहिरात ' या विषयावरील अंतरराष्ट्रीय चर्चासत्रात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

अलेक पदमसी पुढे म्हणाले ' भारतात हजारो ब्रांड तयार होत असले तरी हि मोठी प्रक्रिया असून त्यात विश्वासार्हता निर्माण करावी लागते.विश्वासार्हता हेच 'ब्रांड ' चे दुसरे नाव आहे.जाहिरातीच्या कल्पक उपयोगाने ब्रांड तयार होतो ,मात्र जनतेच्या स्मरणात तो राहण्यासाठी त्यातील मनोरंजन,संगीत ,प्रेरणा आणि उपयुक्तता या गोष्टी उपयुक्त ठरतात.जाहिरात तयार करताना चांगल्या कल्पना बाबत आग्रही राहायला हवे '

कोणतीही नकारात्मक गोष्ट जाहिराती मधून मांडलेली जनतेला रुचत नाही.त्यामुळे उपदेशाच्या फंदात न पडता ,ग्राहकांना विचार करायला भाग पाडणे आणि निर्णय त्यांच्यावर सोपवणे अधिक उपयुक्त ठरते असे त्यांनी उदाहरणे देऊन सांगितले.प्रभावी जाहिरात तयार होण्यासाठी ग्राहकांना,विचार करायला उद्युक्त करणे संप्रे ष्णा च्या दृष्टीने महत्वाचे ठरते. 
 प्रल्हाद ककर यांची कार्यशाळा भारतातील जाहिरात उद्योग हा जगातील सर्वोत्तम जाहिराती तयार करतो . या जाहिराती सर्वोत्तम होतात कारण भारतातील जाहिरात निर्माते त्यात उत्तम आशयवृद्धी करून गुणवत्तेची भर घालतात . उत्पादनाच्या संदेशात गुणवत्ता वृद्धी करणे म्हणजे जाहिरात होय ' असे प्रतिपादन आज प्रसिद्ध 'एड गुरु ' (जाहिरात  गुरु ) प्रल्हाद ककर यांनी केले .

तरुणांनी नव्या स्वप्नांचा शोध घेवून ,चाकोरी मोडून धाडसी जीवन जगण्याचा संकल्प करावा असे आवाहन त्यांनी केले 

महाराष्ट्र कोस्मोपोलीटन एजुकेशन सोसायटीच्या अल्लाना इंस्तीत्युत ऑफ मेनेजमेंत सायन्सेस ' च्या वतीने आयोजित 'मिलान्ज ऑफ ब्रान्डीन्ग आयडीयाज ' या कार्यशाळेत ते बोलत  होते . व्यवस्थापन शाखेचे विद्यार्थी ,प्राध्यापक या कार्यशाळेत सहभागी झाले होते . प्रल्हाद कक्कर यांनी मार्गदर्शन केले .


अभिव्यक्तीची कोणतीही भाषा नसते ,धाडसाला सीमा नसते !:
प्रल्हाद  ककर 

,' निर्मितीची  आणि विचाराची पारंपारिक चौकट ,नियम मोडणे  हे जाहिरात क्षेत्रात आणि जीवनातही यशस्वी होण्यासाठी आवश्यक असते . परिस्थिती सतत बदलत असल्याने जुने नियम  मोडून नवे प्रस्थापित करण्याची गरज असते . नवे घडविताना बंन्ड करण्याची आवश्यकता असते. मात्र हे बंड करताना विषयाची आवड ,ज्ञान ,दूरदृष्टी आवश्यक असते .

तरुणांनी व्यवस्थापन शास्त्र शिकून मोठ्या कंपन्यात नोकर होण्यापेक्षा  उद्योजक होण्याची आकांक्षा बाळगली पाहिजे . त्यामुळे नव निर्मिती करण्याची ,संघर्ष करण्याची आणि खरे समाधान मिळविण्याची संधी मिळते .
 जाहिरात  हा स्वप्न निर्मिती चा व्यवसाय  असून त्यात नव्या कल्पना शोधणे ,धाडस करणे आणि निर्णय क्षमता असणे आवश्यक असते . कष्ट घेतल्याशिवाय यशाचे नंदनवन दिसत नाही .


आता  मला प्रल्हाद ककर यांच्या बाबतीत काय भावले ते सांगतो . !

प्रल्हाद  ककर यांची प्रतिमा माझ्या मनात एक अत्यंत यशस्वी आड फिल्म मेकर अशी होती पण मैत्रिणीच्या घोळक्यात असलेले ,सिगार ओढणारे 'प्रस्थापित  ' अशी होती . अलेक हे गुरु तर प्रल्हाद  ककर हे यशस्वी बंडखोर असे मला वाटत असे . पण पांढरी लुंगी ,झब्बा ,वाढलेली दाढी आणि रुळणारे केस ,चेहऱ्यावर सतत मंद स्मित  हे पाहून मला ते आधुनिक ऋषी वाटू लागले . त्यांनी मांडलेले विचार हे बंडखोर तत्वज्ञा  पेक्षा  काही कमी नव्हते .

या कार्यशाळेत  त्यांनी त्यांना आवडलेल्या जाहिराती (फिल्म ) दाखवल्या . त्यात हि सर्व  फिल्म त्यांच्याच दाखवता आल्या असत्या ,पण इतर आड मेकर्स प्रसून पांडे यांच्या फिल्म्स पण दाखवल्या . माझे बँक अकौंट नाही .मी पैशाला स्पर्श हि  करत नाही .  जे पैसे मिळतील ते मी बायकोच्या स्वाधीन करतो . माझ्या स्वताच्या खर्चासाठी  मला अजून काही असाइन्मेन्त कराव्या लागतात ! जे पैसे मिळतात  ते आम्ही पार्ट्यांवर खर्च करतो असे बिनदिक्कत त्यांनी सांगितले . तरुण मुले माझ्या ऑफिस मध्ये शिकायला येतात त्यांच्यावर मी खर्च करतो आणि आज जाहिरात इंडस्ट्री मध्ये ६ ० टक्के मुले आमची आहेत .
पुण्यात फर्गसन कॉलेज ला मी शिकत असताना माझी खोली हि लोकमान्य टिळक यांनी वास्तव्य केलेली खोली होती ,तिच्या जवळ होती . माझ्या  खोलीत त्या वेळी नॉन वेज मिळत असल्याने तिथे वर्दळ असायची . फर्गसन त्यावेळी ब्राह्मणी ठसा असलेले महाविद्यालय असल्याने त्यांना हे चालणे शक्य नव्हते. अखेर मला होस्टेल मधून काढून टाकण्यात आले ! म्हणून मी पुणेकर च आहे . Reputation Follows you,wherever you are !
माझ्याबरोबर सिद्धोजीराव शितोळे फर्गसन ला होते . ते आता अध्यात्मिक गुरु झाले आहेत . त्या  वेळी माझे टोपण नाब्व रोबिन होते . पुणे विद्यापीठात मला  सामरिक  विभागात चांगले शिकायला मिळाले . मेजर जनरल  परांजपे हे प्राध्यापक  होते . ते संथ सुरात बोलायचे . एम  बी ए पेक्षा चांगले शिक्षण तेथे मिळाले . कारण मार्केटिंग हे एक  युद्धच असते . Art of War ! महाभारतात कृष्ण अर्जुनाला युद्धासाठी उद्युक्त करत असतो . हे  अध्यात्मिक संभाषण नाही तर व्यवस्थापनाचे मार्गदर्शन  आहे  ! You Must Win,There is no going Back !

रॉबिन ते प्रल्हाद कक्कर हा प्रवास तसा योगायोगा नेच झाला .इकडे  तिकडे काम करत असताना चांगली मैत्रीण असेल तरच मी नोकरी स्वीकारत असे ! 


नियमांचे पुस्तक आपण फेकून दिले पाहिजे . चौकटीच्या बाहेर जाउन विचार केला पाहिजे . नवा ,फ्रेश विचार करायला शिकले पाहिजे . नियम -चौकटी मोडायला शिकले पाहिजे . नियम मोडणे हे उत्क्रांतीत  सतत घडत आले आहे . Dissent is Allowed ! Its yard stick.दुसऱ्या कोणाही पेक्षा तुम्हाला नियम अधिक चांगल्या रीतीने मोडता आले पाहिजेत . तसे घडले आणि तुम्ही यशस्वी झालात तरच तुम्हाला नियम मोडल्याची कोणी शिक्षा करणार नाही ! जुने नियम मोडा पण स्वताचे नियम तयार  करा .
बदल हा जीवनाचा स्थायी भाव आहे असे आपण म्हणत असतो . पण बदल अंगीकारणे हि सोपी गोष्ट नसते . जुन्या पिढीला बदल अजिबात  आवडत ,रुचत नाहीत . आपल्या सुरक्षित चौकटीच्या बाहेर जाउन पाहिले पाहिजे . जुन्या पिढीला बदलाशी जोडून घेणे अवघड वाटत असे . वयाच्या ५ ० वर्षानंतर मन बदलण्याची  प्रक्रिया थांबते . बदलाला मन विरोध करू लागते . बड्या  कंपन्यांचेही तसेच असते ,त्याही बदलला तयार नसतात . अशा वेळी धाडसी व्हावे लागते . बदल का ? बदल  हा फक्त बदल म्हणून घडवायचा नसतो . दूरदृष्टी ,आवड ,ज्ञान यासह बदल  आणि बंड करावे लागते .
बंडाची स्वताची एक पद्धत असते . ती करून पहा . 'असे केले तर काय होईल ,तसे केले तर काय होईल ' असा  फार विचार करत बसू नका …
नोकरी करणे आणि साडेपाच वाजण्याची वाट पाहणे यात काही मजा नाही . स्वताचा व्यवसाय  करणे ,त्यासाठी पंख पसरून झेप घेण्याचे धाडस करणे यात मज आहे . गोव्यात मी पाहिले कि आठवड्यातून  एकदाच मिळणाऱ्या ठिकाणी एक जण मासेमारी करीत  असे .सकाळी  १ पासून तो मस्त ताडी पिउन मासेमारी करीत असे.  रोज मासे पकडले   तर ज्यास्त पैसे मिळतील असे सांगितल्यावर तो म्हणाला . असे केले तर ते मासे लवकर संपून जातील आणि आठवड्यातून एकदा मासेमारी करून जे पैसे मिळतात त्यातून रोज पैसे मिळवून  मला माझी जगण्यातील ,उरलेल्या दिवसात मौज करण्याची गम्मत घालवायची नाही . !
गोव्याची जीवन संस्कृती अशी आहे . ते मस्त  मासेमारी  करतात  ,दारू पितात,गाणी  गातात , त्या नंतर  दिसेल  त्या महिलेवर  प्रेम करतात . ! एक  दिवस  मौज करण्यासाठी  सहा दिवस घड्याळ्याच्या काट्याकडे पाहत  काम  करण्याची संकल्पना  त्यांना  मान्य  नाही . आपली  संस्कृती हि जीवनातील गुणवत्ता पाहणारी संस्कृती  नसून गुलाम गिरीची संस्कृती आहे . त्यामुळे नोकरीत रस वाटतो . साडे पाच  वाजता  सायंकाळी  आपले आयुष्य  उत्साहाने सुरु होते का ? रोज सकाळी उठल्यावर आपले आयुष्य उत्सहाने सुरु झाले पाहिजे . आज आयुष्य आपल्याला नवीन काय देणार आहे याचा उत्साह वाटला पाहिजे !

माष्टर व्हायचे कि नोकर व्हायचे हे ठरवले पाहिजे . अन्त्रप्रुनर झाले पाहिजे . ट्रेडर होवू नका . ट्रेडर हा कमिशन वजा करत असतो ,तर   अन्त्रप्रुनर हा आपल्या योगदानातून कामाची व्हेल्यू (गुणवत्ता ) वाढवत असतो . व्हेल्यू निर्माण करत असतो । 


सेटल्ड ' होणे हा एक असाच भ्रम  आहे . तो बदलाला नाकारत असतो . कार्पोरेट जगात अपयश ढकलण्यासाठी कोणी तरी  'पात्र ' तयार  केले जाते . अपयश त्याच्यावर ढकलले  जाते . संशोधन आपल्या उपयोगी पडतेच असे नाही . बर्याच दा ती एक सोय असते . आपल्याला निर्णय घेताना धोका पत्करावा लागतो .कोणतेही निर्णय हे चुकीचे निर्णय नसतात . इतर लोक जे निर्णय घेवू शकत नाहीत ,ते तुम्हाला घेता आले पाहिजेत .  घोड्यांची शर्यत हे 'मार्केट ' चे उत्कृष्ट उदाहरण आहे . Dont be ' also Ran '  ! फक्त शर्यतीत भाग घेवून उपयोगी नाही ,जिंकणे गरजेचे आहे . शिखर चढाई करत असताना शिखराच्या बेस केम्प वर जाऊन पाय  दुखताहेत म्हणून परत फिरण्यात अर्थ नसतो . वाटेल ते झाले तरी चालेल पण मी शिखर पादाक्रांत करेनच असा चंग बांधला पाहिजे ,


आभाळात विहार करण्याचा आनंद हा फक्त जे झेप घेवू शकतात तेच जाणू शकतात .
म्हणून श्रद्धा आणि पूर्ण आत्मविश्वासाने निर्णय घेता आले पाहिजेत .
मी लक्षद्वीप जवळ बेटावर स्कुबा डायव्हिंग स्कूल सुरु  केले  आहे .ते मी सतत तोट्यात  चालवत  होतो . ब्रेक इव्हन ला जायला ८ वर्षे लागली  !तेथे जायचे तर मुंबई  ते कोचीन विमानाने जावे लागते ,नंतर अगाती पर्यंत जावे लागते आणि अगति ते बेटापर्यंत मासेमारी इंजिन बोटीच्या 'डग  डग डग ' आवाजात ८ तास प्रवास करावा लागतो . शु '
 करण्याची पण सोय नसते ! माशांचा वास येत असतो . अशा वेळी  या छोट्या बोटीत प्रवास करणे धोक्याचे आहे असे  आईचे म्हणणे आहे असे सांगणे ,किवा आपण हेलीकोप्तर ने जाऊ शकत नाही असे विचारणे मूर्ख पणाचे असते .
आपण अनोळख्या बोटीतून निघालो आहोत . आपल्याला काही नवीन अनुभव मिळेल ,
काही नवीन दिसेल ,बोट उलटली तरी नवे काही अनुभवता येईल अशी मानसिकता असली पाहिजे
काही वेळा नंदनवना पर्यंत जायला पण नरकातून जावे लागते . !


स्कुबा  डायव्हिंग चा अनुभव हा अविस्मरणीय असतो . तेथे हर घडी तुम्हाला समुद्र काही वेगळे दाखवत असतो . समुद्र जर काही महत्वाचे शिकवत असेल तर ते समानता आणि आदर ! तो भीती घालवायला शिकवतो . भीतीतून बाहेर यायला शिकवतो . आपला अहंकार समुद्रात विरघळून जातो . तो आपल्याला जोखीम घ्यायला शिकवतो . आपल्याला अनोळखी प्रांताची भीती वाटते . हि भीती समुद्र घालवतो !समुद्र हा मी घेतलेला आयुष्यातील एकमेव अध्यात्मिक अनुभव आहे .

भारतीय जाहिरात उद्योग हा वेगाने वाढणारा उद्योग आहे . आशयाच्या आधारे गुणवृद्धी करणे हे भारतीय जाहिरात उद्योगाचे वैशिष्ट्य आहे . आपण त्यामुळे सर्वोत्कृष्ट जाहिराती (कमर्शियल ) बनवतो .
जाहिरात उद्योग हा स्वप्नांचा व्यवसाय आहे . Dream at Bill ! Dream at will !असे मी म्हणतो . लोक मला स्वप्न पाहण्यासाठी पैसे देतात . जाहिरात उद्योग हा उद्याबद्दल बोलतो . तो आशेबद्दल बोलतो . त्या क्षणापुरते जेव्हा जाहिरात पाहून दर्शकाचे मन आपण बदलतो ,मत परिवर्तन करतो . तेव्हा आपण जिंकलेलो असतो  !आपण जाहिरातीमध्ये आशयाच्या आधारे गुणवत्ता वृद्धी करीत असतो .
त्यासाठी जाहिरातीची भाषा कोणती आहे ,तिच्यात कोणी काम केले आहे ,हे महत्वाचे नाही. अनेक माझ्या जाहिराती आणि
इतरांच्या आवडत्या जाहिराती मी सांगू शकेन .  पण मला आवडते ती मुकबधीर विद्यार्थ्यांनी केलेली राष्ट्रगीताची जाहिरात . ज्यात साईन लेन्ग्वेज मध्ये ,खाणाखुणांच्या भाषेत ते राष्ट्रगीत म्हणतात ! हीच जाहिरात  माध्यमाची ताकद आहे .

' अभिव्यक्ती कि कोई भाषा  नही होती !

Tuesday, March 12, 2013

सेरेब्रल पाल्सी ' म्हणजे 'बहुविकलांगता ' . या विकारात माणसाचे अनेक अवयव काम करत नाहीत . आणि चालणे -फिरणे बंद होते. तरी जिद्दीने राज्य आयोगाची परीक्षा देवून उत्कर्षा मोहिते हि साताऱ्याची युवती सेल्स टेक्स इन्स्पेक्टर झाली आहे . ! सकाळ टाईम्स ' मध्ये ही बातमी वाचली . आणि साताऱ्याच्या जिजामाता महिला सहकारी बँकेच्या अध्यक्ष आड . वर्षा माडगुळकर यांना उत्कर्षाच्या यशाची कहाणी सांगितली . बँकेच्या वतीने त्या उत्कर्षाचा सत्कार करणार आहेत . हि बातमी लिहिणारे श्रीकांत कात्रे हे माझे साताऱ्यातील जुने -जाणते सहकारी आहेत . त्यांचेही अभिनंदन केले . सकारात्मक बातम्यांनी समाजातील सकारात्मकता वाढीस लावणे हे आपले सर्वांचे काम आहे

Sunday, March 10, 2013

संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त आज 'जनवाणी ' ने पुण्यातील ७ प्रभागात स्वच्छता जन जागरण मोहीम आयोजित केली होती . मी ढोले पाटील रस्त्यावरील महात्मा फुले शाळेत कार्यक्रमाला गेलो. सर्व मुले झाडू घेवून स्वच्छता करू लागले … कार्यक्रमाला आलेल्या नगरसेविका वनिता वागस्कर यांना मी विनंती केली कि मुलांबरोबर आपण सुद्धा झाडू हाती घ्याल का ? आणि त्यांनी माझी विनंती सहजपणे ऐकली देखील .( मी त्या ठिकाणी असल्याचा तेवढाच उपयोग )
ज्या वाटेवर गेलो ,तिथे तुझी भेट नाही
ज्या शिवारात हिंडलो ,तिथे तुझे शेत नाही
रण रणत्या उन्हात ,तुझ्याकडे जाणारा एकही मेघदूत नाही
दिसले हजारो चेहरे ,एकातही तुझे रूप नाही !
कोमसाप ' आणि 'पनवेल टाईम्स '(संपादक गणेश कोळी ) आयोजित पोपटी कवी संमेलन(पनवेल ) साठी प्रमुख पाहुणा म्हणून रविवारी गेलो होतो . पोपटी म्हणजे पाणी न घालता माठात ,शेकोटीवर उकडलेल्या वालाच्या कोवळ्या शेंगा ! त्यात भाम्बुर्डा पाला ,मीठ टाकले जाते. थंडीत हि पोपटी प्रसिद्ध असते . त्यासोबत कवी संमेलन घेण्याची प्रथा पनवेल मध्ये ४ वर्षे प्रचलित आहे. मी पोपटी साठी आणि कविता वाचनासाठी गेलो. प्रमुख पाहुणा म्हणून पोपटीच्या शेकोटीचे प्रज्वलन माझ्या हस्ते झाले … रविवारी मावळत्या वेळी 'धूळ उडवत गायी निघाल्या ' असताना ,नदी काठच्या रस्त्याने ,माथेरान च्या डोंगर रांगा न्याहाळत पोहोचलो .रात्री ' चंद्रचांदणे ',पोपटी आणि कवितांचा आस्वाद . मित्रांचा आपुलकी युक्त सहवास . थोडी फोटोग्राफी ! (प्रमुख पाहुण्यांना आग्रह झाल्याने) मी पण एक कविता सादर केली ! माझ्या भाषणात शंकर सखाराम यांच्या आगरी भागातील कृषी संस्कृती साहित्याचा कृतद्न्य उल्लेख साहजिक होता … एकुणात संस्मरणीय अनुभव
मेंदीच्या पानावर …आता मी जिथे आहे,तिथे भोवताली डोंगर आहेत,,जिथे मी रोज चालायचो,पळायचो ,मध्ये मोठे धरण आहे।तिथे रोज ४ किलोमीटर मी पोहायचो … इथे माझी 12 पर्यंतची शाळा आहे,या शाळेत मी प्रमाणपत्रांचा डोंगर उभा केला होता ,इथे आज जत्रा आहे, तमाशा -जागर आहे,चंद्र आहे ,मी आणि मित्र रात्र रात्र जागायचो ,रात्री चांदण्यात पोहायचो …. इथे मी चित्रकला -मित्रकला शिकलो …. सारे काही भव्य । ७० एम एम केनव्हास ,हि आस इथलीच .इथे ऐकली गाणी जीवाचे कान करून । मैत्रिणींवर झुरलो रात्रंदिन …. इथेच आरत्यांचे धूप भरले श्वास खोलवर घेतले होते आत आत .

जीव लावणे,जीव ओवाळणे … इथे तर शिकलो

इथले दुक्ख -दर्द ठेवलेत लपवून धरणाच्या खाली पाताळात खोल दडवून ….

इथे मी जिंकलो -हारलो. जग जिंकण्याची ईर्ष्या इथली माती पाठीला -छातीला लागल्यापासून आहेच प्रज्वलित ।

इथूनच विस्थापित झालो । बहेर जाउन प्रस्थापित झालो

आज इथेच असायला हवे . आपण कुठे जाउन पोहोचलो ,यापेक्षा आपण कुठून आलो हे महत्वाचे …. बहुधा
गरवारे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी ! :

संगीत नाट्याची कीर्ती ध्वजा तळपत ठेवणाऱ्या कीर्ती शिलेदार या गरवारे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत . त्यांची मुलाखत विद्यार्थी संपादक या नात्याने मी १ ९ ९ ५ साली कोलेजच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त प्रकाशित 'आगम ' या नियतकालिकात घेतली होती . त्यानंतर आज महिला दिनी भेट झाली . ती देखील डॉ .सतिश देसाई अध्यक्ष असलेल्या नाट्य परिषदेने पद्मश्री जयमाला शिलेदार यांचा सन्मान कार्यक्रम आयोजित केल्याने झाली .

योगायोग असा कि डॉ .सतिश देसाई हे देखील गरवारे चे माजी विद्यार्थी आहेत. ! त्याच अंकात मी डॉ .सतिश देसाई यांचीही मुलाखत घेतली होती

डॉ .सतिश देसाई हे आजच्या कार्यक्रमाचे संयोजक होते ,कीर्ती शिलेदार या जयमाला ताई बरोबर आल्या होत्या आणि माझ्याकडे या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीची जबाबदारी होती .

आणि हा फोटो ज्या प्रिया कुलकर्णी यांनी हा फोटो काढला त्या पद्मश्री जयमाला शिलेदार यांच्या नात असून त्याही गरवारे कॉलेज च्या माजी विद्यार्थिनी आणि माझ्या सहाध्यायी आहेत

आहे कि नाही माजी विद्यार्थ्यांची गम्मत !

गुलझार च्या हुकलेल्या भेटीची पण कविता होते तेव्हा …

आज गुलझार यांच्या हस्ते अक्षरधारा च्या कार्यक्रमात पुस्तक प्रकाशन होते . रमेश राठीवडेकर हे जवळचे स्नेही आहेत . त्यांच्या बरोबर राहिलो तर गुलझार यांच्याशी भेटता येईल ,फोटो घेता येईल ,असा विचार सकाळीच मनात डोकावला होता .

तेवढ्यात दृष्टिहीनांसाठी काम करणाऱ्या आणि स्वत दृष्टिहीन असणाऱ्या कार्यकर्त्या सकीना बेदी यांचा फोन आला . त्यांना गुलझार यांना भेटायचेच होते . मला एकदम जबाबदारीचे ओझे वाटू लागले . (वास्तविक राठीवडेकर आणि बेदी दोघेही आमच्या संस्थेच्या पी ए इनामदार सामाजिक कृतज्ञता पुरस्काराचे मानकरी आहेत ) मी राठीवडेकर यांना फोन करून सकीना यांची सपत्नीक भेट गुलझार यांच्याशी घडवून आणता येते का पहा ,अशी विनंती केली .पण कार्यक्रमाच्या गडबडीत असलेल्या राठीवडेकर यांचा स्वर आश्वासक वाटला नाही .

शेवटी मी हि भेट परिस्थितीवर सोडली . भेट झाली नाही तर सकीना यांची होणारी निराशा पाहायला आपण तिथे असू नये ,असे वाटले आणि मी टिळक स्मारक पासून जवळ घरी असून सुधा कार्यक्रमाला गेलो नाही ।

कार्यक्रम संपला आणि सकिना यांचा भावनेने ओथबलेला फोन आला . तेव्हा त्यांचे काम झाले असे वाटून हायसे वाटले . पण खरी गम्मत पुढेच आहे . राठीवडेकर यांनी गुलझार यांच्या उपस्थितीत ५ वाचकांच्या हस्ते ते प्रकाशन केले आणि त्यात सकीना यांचा समावेश केला होता . ! सकीना आणि त्यांचे पती अत्यंत भारावून गेले होते … त्यांचा दिवस संस्मरणीय ठरला होता …

विकेट माझीच उडाली होति. ! माझी आणि गुलझार यांची भेट नाही होवू शकली ,फोटो राहून गेला होता । पण सकीना यांचा सुखद अनुभव ऐकला आणि वाटले कि गुलझार बोलतो तेव्हा'त्याची कविता होते . पण त्याच्या राहून गेलेल्या भेटीची सुद्धा कविता होते ! वाह क्या बात है … ऐ जिंदगी गले लगा ले
घंटा वाजवता येईल का  ?

आज ब्रिटीश संशोधक पुण्याच्या 'हेरीटेज  वॉक  ' मध्ये सहभागी व्हायला आले होते . जनवाणी -आणि पुणे पालिकेच्या या वॉक चे वार्तांकन आम्ही 'प्रबोधन  माध्यम ' च्या वतीने करीत  असतो . घट स्थापनेला सुरु झालेला हा उपक्रम चांगला जोम  धरून आहे . त्यात  अनेक वेगळे अनुभव येत असतात . आज  जे ब्रिटीश संशोधक सहभागी झाले  ते बेलबाग मंदिराजवळ अचानक त्यांच्या एका स्वर्गीय ब्रिटीश  मित्राच्या आठवणीने रडू लागले ! चर्च मध्ये जशी मित्रासाठी  प्रार्थना करता  येते . तसे काही या मंदिरात  घंटा वाजवून करता  येईल  का असे त्यांनी  विचारले . मंदिरात घंटा वाजवून प्रार्थना करतात  ,हे त्यांनी वाचले  होते . (माणसे  शेवटी  माणसे  असतात ,धर्माच्या  भिंती फक्त ओलांडता  आल्या पाहिजेत  )

Tuesday, February 5, 2013

अजून छान 'बर्फ बारी ' होतेय काश्मीर मध्ये ....ऑनलाईन असलेल्या अशीक रेशी या मित्राला म्हटले ' थोडी बर्फ बारी ' इधर भेज दो न ! ' लगेच त्याने घराजवळच्या वाटेचा बर्फ भरला फोटो पाठवला....तो पहिला ,डोळे मिटले ...मन लगेच तिथे गेले.हळुवार पणे हातमोजे घातले ...बर्फात पाय गुडघ्या इतके रुतवले ....बर्फाचा गोळा केला आणि लां...ब फेकला....Miss you Kashmir ,Miss you all !



अब भी अच्छी बर्फ बारी हो रही है काश्मीर मे ! मेरे दोस्त अशिक रेशी ,जो ओनलायीन थे ,उनको कहा :थोडी बर्फ बारी इधर भेज दो ना ! उन्होने तुरंत उनके घर कि राह पार जमा बर्फ का अच्छासा फोटो भेजा...मैने फोटो देखा ,आंखे बंद कि ...मेरा मन अचानक बर्फ कि तिले पर जा पहुंचा ...हात मे हलकेसे ग्लोव्ज पेहने ...फिर बर्फ मे पैर घुटने तक डाले ...हात मे बडा सा बरफ का गोला जमाया ...और दूर ,काफी दूर फेंक दिया....बस ! ......कुछ यादे ,कुछ लम्हे ..कुछ पल ..काश्मीर के ! Miss you kashmir ,miss you all !

मला आवडलेले गाणे परत ऐकताना किमान ५ वेळा तरी ऐकतो...प्रत्येक चाल,सुर्,वाद्य ....लकेर मनात बसेल इतपर्यंत ऐकतो.त्या शिवाय ते गाणे मला आवडलेय असे वाटत च नाही ! ..आणि आता ऐकत आहोत त्या पेक्षा आणखी बरया ' सिस्टिम ' मग ते गाणे ऐकावेसे वाटते ....! अगदी ऐकले त्याच सुरात ते म्हणावेसे पण वाटते. म्हणायला जमले ,कि समजते ,' 'चीज ' आवडलीय आपल्याला !

Sunday, February 3, 2013

कशाला उगाच लांबच्या बाता ..
कशाला घोर जीवाला आता..
बोलून टाकू मनातले..
आयुष्यातून जाता जाता .....!
तू मला विसरून जावे
मी तुला आठवून गावे
वळले ते कटाक्ष जरी
जपले खरे ते जीव भावे !

Friday, February 1, 2013

काय भेट देऊ तुला ?

by Deepak Bidkar on Wednesday, October 26, 2011 at 11:08am ·

काय भेट देऊ तुला ?

काय भेट देऊ तुला ? हा दर वर्षी पडणारा प्रश्न...गौरी ला दर वर्षी काही दिवाळी भेट द्यायचे जमतेच असे नाही...गेल्या कित्येक वर्षात तिला साडी देखील घेतल्याचे मला आठवत नाही...असा आमचा न्यारा संसार...दिवाळी अशी तर उर्वरित वर्ष कसे ,याचा अंदाज यावरून यावा..
पण यावर्षी तिला काही भेट द्यायचीच असा चंग मी बांधला होता..

कार्यालयातील सर्वांचा बोनस,वर्षभर ज्यांचे पैसे द्यायचे राहिलेले असतात अशांची दिवाळी ,त्यातच या वर्षी आमचा 'सर्वधर्मीय दिवाळी ' हा जोरदार कार्यक्रम -उपक्रम होता..त्यात जमेल तितक्या सामाजिक,राजकीय,मित्र मडली बरोबर दिवाळी फराळ केला ,खूप समाधान वाटले..
नंतर अनेक कार्यालयातून दिवाळी भेटी देण्याचे दामाव्णारे पण समाधान देणारे काम पूर्ण करत आणले,
काही दिवाळी अंकांना ,दैनिकांना दिवाळीत हि मजकूर लागतो,आमच्या शी संबंधित संस्था,पक्ष यांच्या बातम्या दिवाळी त हि सुरु असतात...मग सुट्टी कुठली मिळायला ?

त्यामुळे दिवाळी हे दर वर्षी संकट वाटते,या वर्षी तसे वाटले...
आणि त्यातून सुखरूप बाहेर पडताना लक्षात आले गौरीला भेट द्यायची राहिली आहेच,
मग दमलेली पावले घेऊन सर्व रस्ता पालथा घातला,पण गौरीला आवडणारी वस्तू...हल्ली बाजारात सहज मिळत नाही हे लक्षात आले,

एका ठिकाणी ती वस्तू मिळाली !
काळा रेडीओ !
गौरी चा आवाज गोड,आकाशवाणीच्या पहिल्या मुलाखतीसाठी ती पुण्यावरून सातारला आली,भर पावसात आम्ही ती मुलाखत दिली ..आणि गौरीचा आवाज सातारा आकशवाणी वर ऐकायला येवू लागला..

नंतर पुण्यात आल्यावर ती पहाटे पुणे आकशवाणी केंद्रावर जाऊ लागली..
घरातील सर्व आवरून ती जायची,तेव्हा खूप समाधानी असायची..,
स्तुदिओ मधील धावपळ,रेकॉर्ड शोधणे,अनाउन्समेंट करणे,खूप हौसेने करायची,
मग आमची न्यूज अजेन्सी सुरु झाली आणि बिचारीला मला मदत करायला आकाशवाणी सोडायला लागली,
त्याची खंत अजून ताजी आहे,

मग जगण्याच्या धबडग्यात आकाशवाणी संच घरातून हरवून गेले,मोबाईल मध्ये आकाशवाणी असून ऐकता येईना..
गौरीची आणि आकाशवाणीची हि ताटातूट दुखः दायक च होती.
आमच्या बिल्डींग खाली इस्त्री वाले मोठ्या आवाजात एफ एम लावत..वाऱ्याच्या लहरींवर ते सूर कानी पडले कि ती ऐकत काम करत असे,
आधी आणलेले छोटे रेदिओ ,टू इन वन कालबाह्य होवून अडगळीत गेलेले...

आणि गौरीची आकाशवाणी ची हौस देखील !

...मला त्या दुकानात दिसलेला काळा फिलिप्स चा रेडीओ पाहून मला सारे आठवले..!
घरी आल्यावर डोळे मिटायला लाऊन मी तो गौरीच्या हातात दिला..

भेट काय देऊ तुला ? हा प्रश्न सुटला..आणि दोघांच्याही डोळ्यात पाणी तरारले ...

Thursday, January 31, 2013

घटस्थापना झाली ...नवरात्र झाले ..आज विजयादशमी !

 मला आठवते माझ्या आजोळी  जावली  तालुक्यातील खर्शी जवळ हात्गेघर येथे  लहानपणी  या घटात  पेरलेले धान्य नऊ  दिवसात उगवल्यावर ..दसर्याला त्याचे तुरे आम्ही मुले आणि तरुण मंडळी डोक्यावरील पांढर्या गांधी टोपीत खोचून मिरवत असू ! परवा माझ्या घटस्थापना  पोस्ट  वर कॉमेंट  करताना ज्येष्ठ कार्यकर्ते भारत पाटणकर म्हणाले ' हा कृषी संस्कृतीचा सण  आहे ! ' .

खरे  आहे हि कृषी संस्कृती चे घट हे  छोटे रूप   आणि त्यातील उगवून आलेले तुरे आजही लहान मुलासारखे टोपीत मिरवावेसे  वाटतात ....

विजयादशमी ,सीमोल्लंघन ..दसरा ! वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याची आपली प्रेरणा अक्षय राहो ,हीच शुभेच्छा !

सर्वाना मनपूर्वक शुभेच्छा ..

Tuesday, January 29, 2013

आज गावचा बालमित्र बी  एम डब्ल्यू  घेवून भेटायला आला.छोटी सैर मुलाबरोबर आणि फोटोसेशन  अर्थातच झाले.गाडीतील ऑडियो सिस्टीम उत्सुकतेने ऐकली ...फार मजा  आली नाही.मित्राला म्हणालो 'गावी टकारा TKR  कंपनीच्या कारटेप  ला स्पीकर भोवती मडकी -खोकी लावून पान पट्टीत देखील जो ' इफेक्ट ' आणला जायचा ,त्याची सर या गाडीतील म्युझिक  सिस्टीम ला नाही गड्या ! '  ...आणि खळखळून हसत आम्ही जुन्या आठवणीत रमून गेलो..!

Tuesday, January 22, 2013

 शाळेचा पहिला दिवस...


सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस...आदित्य आणी अविरत निघाले शाळेत. .! मला आठवते आमच्या जावळी तालुक्यात सुट्टीनंतर शाळा भरायची तेव्हा पहिले काम प्राणी -पक्षांनी खराब केलेल्या वर्गांची स्वच्छता हे असायचे .आता पुण्यात शाळेचा पहिला दिवस म्हणजे त्यांचे स्वागत,आरती ओवाळणे,आनंददायी शिक्षण वगेरे ! वक्त वक्त कि बात है !
 
15june 2012

Friday, January 18, 2013

एक आठवण: रथ सप्तमी उपवास सूर्य पूजनाची ..
आणि गावची !


पुण्यात पत्रकार असलेला जावळी तालक्यातील एक मित्र गावी निघणार आहे.तो गावी जाणार म्हटल्यावर माझा हळवा कोपरा जागा होवून थेट झोंबणारया थंडीतील रथसप्तमी उपवासांच्या आठवणीत शिरला...!
आमच्या आजोळी जावळी तालुक्यात रथसप्तमी च्या काळात घरोघरी महिला सूर्याचे उपवास करतात.माझी आई पण करायची...रथसप्तमी ला अंगणात रांगोळी काढण,सुर्य प्रतिमा रेखाटून त्यावर गोवऱ्या ठेवून मातीच्या भांड्यात दुध उतू जाई पर्यंत तापविण्याचा विधी केला जाई. ( उगवत्या सूर्याचे हे उपवास माघ शुद्ध प्रतिपदेपासून सप्तमी पर्यंत केले जातात.सात दिवसांच्या या उपवासाला खेडोपाडी ममई (मुंबई) वरून सफरचंदे,सुका मेवा येत असे .वर्षातून एकदाच त्याचे दर्शन होई...सूर्याला अनेक नवस बोलले जातात.माझ्या आणि माझ्या बहिणीच्या जन्मापूर्वी आईने असे उपवास कारण नवस बोलले होते.! ) त्या आठवणीने आज उगाच मन भूतकाळात शिरले...डोंगराच्या कुशीत बोचरी थंडी पडलीय..शिवारात शाळू -हरभरा-पावटा डोलतोय...कौलारू घरातून सीताबाई -फुलाबाई अंगणात आल्यात...गुरांच्या गळ्यातील घंटांचा आवाज येतोय...जमेल तशी सूर्य प्रतिमा (' सुर्वे ' देवाची ! ) रांगोळीने रेखाटून गोवऱ्या प्रज्वलित केल्या जात आहेत... सुगडीत दुध उतू घालवताहेत..दूरदेशी असलेल्या नवऱ्याच्या -मुलांच्या साठी नवस बोलले जाताहेत..गोवऱ्यांचा धूर होतोय ... प्रसादाची देवाण -घेवाण होतेय...गोवऱ्याच्या धुराने ,सग्या -सोयऱ्यांच्या आठवणीने डोळे पाणावत आहेत...( तेव्हा गोवऱ्याच्या धुराने त्यांचे आणि आज आठवणीनी माझे..! )

Wednesday, January 16, 2013

माझ्या शाळेचे नाव होते ' जीवन शिक्षण विद्या मंदिर ' !

खेडेगावात अशीच नावे असतात...अशी नावे देण्याची ज्या कोणाची कल्पना असेल,त्यांना आज शिक्षक दिनी खणखणीत सलाम !   

 तेथील शिक्षकांनी काही संस्कार वगेरे केले नाहीत....आम्हीच सारवलेल्या जमिनींवर बसायचो आम्ही शाळेत ..मला सातवीपर्यंत भागाकार पण येत नव्हता .

त्या शिक्षकांमध्ये विशेष  काही नव्हते .पण त्या शाळा,ते पाढे...मोडलेल्या पेन्सिली...हातावर घेतलेल्या छड्या, वार्षिक परीक्षा बुडवून खालेल्या कैऱ्या..      तो परिसर,ते डोंगर,झोडपून काढणारा पाउस . ,ते गोठे,ते सण ,ते गाव ....त्या साऱ्यांचे जीवनाला   Live ...थेट भिडणे ,यात मजा होती ! 

माझे शिक्षण अजून चालूच आहे.
........शाळेचे नाव आहे :जीवन शिक्षण विद्या मंदिर !

Missed all on ' Happy Teachers Day !

5th sapt 2012
परवा खासदार वंदना चव्हाण यांच्या वाढ दिवसानिमित्त भल्या सकाळी  नगरसेविका नंदा लोणकर यांनी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता.

त्याआधी माउंट कार्मेल शाळेत विद्यर्थ्यांनी पर्यावरण विषयावर नाटुकले सादर केले ...सत्कार,भाषणे,...घड्याळाचा काटा पुढे सरकत होता.पुढचे ढीगभर कार्यक्रम डोळ्यासमोर दिसत होते.

सभागृहापासून वृक्षारोपण स्थळ टेकाडावर असल्याने सर्व ताफा झप झप चालत निघाला...एक अनामिक ,निशब्द ताण वातावरणात उगाचच तयार झाला होता...
चालताना कोणीच कोणाशी बोलत नव्हते...तो  ताण दूर करण्यासाठी मी शब्द शोधले ,' काय वंदनाताई, तुमच्या वाढदिवशी वृक्षारोपणा बरोबर ' नेचर वाक ' (nature walk ) पण नंदाताईंनी आयोजित केलेला दिसतोय ! 
.
....वंदना ताईंच्या पर्यावरण प्रेमाचा आणी वृक्षारोपण स्थळाकडे टेकडी वर चालण्याचा संदर्भ लक्षात घेवून सर्वच ताफा खळाळून हसला ! वातावरण अधिकच खुलले ....

 अनामिक ताणाचा निचरा झाला...
पण तेथे असल्याचा तेवढा तरी उपयोग.... !

अगदी डोळ्यादेखत 
ज्येष्ठ कवयित्री ( आणी आचार्य अत्रे यांच्या कन्या ) शिरीष पै यांच्याशी फोन वर खूप छान बोलणे झाले...२००० ते २००२ या काळात त्यांच्याशी लेखांच्या निमित्ताने खूप चर्चा -भेटी व्हायच्या .

शिवाजी पार्क जवळ समुद्र किनार्यावरील त्यांच्या घरी नेहमी भेट होत असे

...प्रदीर्घ काळानंतर हि त्यांनी मला ओळखले ,आवाज ओळखला याचा आनंद आहे...गुरुवारी त्यांची ' थेट भेट ' होणार आहे...जुन्या स्मृतींना उजाळा...

' तुमचे येणे कमी झाले ,आणी माझे लेख लिहिण्याचे जवळ जवळ थांबलेच ',असे त्या म्हणाल्या तेव्हा वाईट वाटले...त्या बोलायच्या आणी मी शब्दांकन करायचो ,असा काल होता तो.

महाराष्ट्रातील २५ तरी मान्यवरांना असे शब्दांकन द्वारे लिखाण करायची सवय आमच्यामुळे लागली होती...

मराठी दैनिकांना सहजगत्या मोठ्या व्यक्तींचे लेख मिळायचे .आता आम्ही ' न्यूज अजेन्सी ' म्हणून पुढे आल्याने बातम्याच्या मागे गेलो .आणी लेख लिहिणे ,शिरीष ताईंचे काय आणी माझे काय ,थांबलेच ...

कधी कधी विषय खुणावतात,शब्द जुळतात...पण त्याचा लेख होण्याची बैठक जुळत नाही ....... '

' लेखांचे दिवस ' आठवले कि डोळ्यात हळुवार पाणी येते खरे.

नकळत आपण बरेच काही गमावत असतो...अगदी डोळ्यादेखत


--

Monday, January 14, 2013

----------------------
अनुभव .. अनुभव .... अनुभव .काल रविवारी दिवसभर महाराष्ट्र गांधी स्मारक निधी (कोथरूड) च्या शांत परिसरात डॉ.कुमार सप्तर्षी,डॉ.सदानंद मोरे,अनंत दीक्षित अशा मान्यवरा समवेत गांधी विचार ऐकत दिवस व्यतीत केला.दुपारी माहितीपट पहिला .सायंकाळी  गांधी सप्ताहाचा समारोप झाला.डॉक्टर सप्तर्षी यांच्या बोलण्याची सोबत दिवसभर होती...चंद्रशेखर ,भारत यात्रा,गांधी ,नथुराम ,गांधी विचार केंद्राचा महाप्रकल्प ,अण्णा ,अविनाश धर्माधिकारी ,केजरीवाल असे नानाविध विषय त्यात येत होते...तरुण कार्यकर्त्यांचे 'युक्रांद ' अवती - भोवती होते....जेवण एका कम्युन सारखे केले..सायंकाळी चहा त्यांच्याबरोबरच....खूप दिवसांनी इन शर्ट काढून झब्बा घालून कार्यकर्ता झाल्या सारखे वाटले...मस्त फकिरी दिवसभर !
---------------

जेव्हा चांगले प्रयत्न,प्रयोग,काम  मूक पणे होत राहतील ,तेव्हा आपण अंधारात एखादे 'पाप ' करण्याइतके ते भयंकर आहे ,असे माझे आणखी एक 'नम्र ' मत आहे..चांगल्या गोष्टी बोंबलून सांगा जगाला...कळू द्या सारे सकारात्मक प्रयत्न .बाजूला पडू नका ....सेंटर स्टेज वर या ....गाजवा नव्या क्रांत्या ...करा गहजब ....दिपवून टाका अंधाराला तुमच्या कामाने ....लाजता कशाला बुवा ?
----------------------
अनुभव .. अनुभव .... अनुभव ...(फक्त आजचेच )

अनुभव १.
 मी लिफ्ट पकडत असताना  सकाळी सोसायटीची कचरावेचक महिला तिची बकेट घेवून लिफ्ट जवळ थबकली .मी चला म्हटले तर म्हणल्या ,' तुम्हाला चालेल का ?' (बहुतेक जण बकेट बरोबर लिफ्ट प्रवास टाळतात !)  मी म्हटले 'अहो हा कचरा आमचाच आहे,त्यासोबत लिफ्ट मध्ये जाण्यात मला काही त्रास नाही.तुम्ही चला बकेट घेवून ' .थोडा खिन्न झालो... मला वाटले हि नवी अस्पृश्यता, काही सेकंदांची, समाजात तयार झाली आहे का ? '
---------------------------
अनुभव २.
विजय पांढरे यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांचे काम केल्याने अनेक जणांना कसे रियाक्ट व्हावे कळत  नाही.मला वयक्तिक पातळीवर त्यांच्या धाडसाचे आदर युक्त कौतुक तर वाटतेच ,पण जे सत्य आहे,जे कायदे आहेत,आणी जी लोकशाही आहे...त्या पद्धतीने पुढे गेलेच पाहिजे .' व्हिसल ब्लोअर ' या दुर्मिळ घटकाचे स्वागत तर करूया ...चौकशी नंतर काय सत्य समोर यायचे ते येवूद्या 
----------------------------------------
अनुभव ३. 
:पुण्याच्या रानडे इंस्तीटयुत(पुणे विद्यापीठ )  या पत्रकारिता महाविद्यालयाचे ३ विद्यार्थी पुण्याच्या टेकड्यांचा  विषय लिहायचा म्हणून मला भेटायला आले ( मी सेव्ह पुणे हिल्स इनिशिअतिव्ह  ' या संस्थेचा निमंत्रक आहे )...विषयातील गुंतागुंत त्यांच्या लक्षात येईल तेव्हा येईल, पण त्यांचे ताजे चेहेरे ,काही ऐकायची ,नवे प्रश्न विचारण्याची ओढ पाहून फार बरे वाटले ...
-------------------------------------------
अनुभव ४
. प्रसिद्ध दिग्दर्शक संजय सूरकर यांचे ताणा मुळे निधन झाले .हे झाले तेव्हा मी त्यांच्या टीम मध्ये काम करणाऱ्या माझ्या मित्राबरोबर होतो.एक श्रेष्ठ दिग्दर्शक तर आपण गमावलाच .पण मराठी च्या जुन्या दु :खाना पुन्हा खपली काढते झालो .( सूरकर दिग्दर्शित 'लाठी ' या रेगाळलेल्या      चित्रपटात सचिन खेडेकर च्या नातूची भूमिका माझ्या मोठ्या मुलाने -आदित्य ने केली आहे.त्या निमित्ताने सूरकर यांचा सहवास त्याला नि मला मिळाला होता .सुरकरांच्या पश्चात     पहिली  चांगली  भूमिका पडद्यावर येण्यासाठी आदित्यला किती वाट पहावी लागणार ,कोण जाणे  ?) 
--------------------------------------------------
अनुभव ५:
सुफी संगीताचा कार्यक्रम पी ए इनामदार यांनी हिकमतीने  पुणे फेस्टिव्हल मध्ये घडवून आणला..खूप गर्दी  झाली.पण दरवर्षी 'मुशायरा ' आणी शेरो -शायरी ' हा सहज आवडणारा प्रकार पाहायला येणाऱ्या मंडळीना 'सुफी ' संगीतातला ,शब्दातला अर्थ गर्भ लवकर कळलाच नाही..फक्त सहज सोपे च आपण देत राहायचे का ?
---------------------------

तेवढीच जाणीव !

' राष्ट्रीय दृष्टिहीन संघ - ' ग्रांट ए स्माईल फौंडेशन ' आणी रोटरी क्लब ऑफ पुणे सेन्ट्रल ' आयोजित ब्रेल पुस्तक प्रकाशन सोहळ्यात संयोजक आणी जिंदादिल समाजसेवक  अनिल बोरा यांनी माझा छोटेखानी सत्कार केला.मला संकोच वाटला. ...

त्यांनी आपल्याला फुले द्यावीत इतके आपण दृष्टिहीन बांधवांसाठी काही केलेलं नाही...जाता -जाता काही गोष्टी केल्या .पण आणखी  केले पाहिजे असे मात्र बोचत राहिले... डोळस मंडळीना वाचायला लाखो पुस्तके आहेत..पण अंध बांधवाना ब्रेल लिपीत फारसे काही नाही.

माझ्या कार्यालयात मी हौसेने फोटो -बिटो लावायला निळाशार छानदार नोटीस बोर्ड घेतला आहे... पाडव्याला .सहा महिन्यापूर्वी.तेव्हा 'जागृती ब्रेल प्रेस ' चे  आळंदी येथे उद्घाटन झाले होते.मी सणाच्या दिवशी आवर्जून गेलो होतो..आल्यावर उद्घाटनाच्या दिवशी ब्रेल मध्ये छापलेल्या अभंगाच्या ओळी चा कागद त्यांनी मला भेट म्हणून दिला होता. तो ब्रेल अभंगाचा कागद माझ्या नव्या बोर्डावर लावला.

खरे सांगतो, आजतागायत दुसरे काहीही त्या बोर्डावर लावावेसे वाटले नाही....तेवढीच जाणीव.आपल्या बांधवांसाठी  आपल्याला अजून काही करायचे आहे याची .

--
एक अति वृद्ध स्वातंत्र्य सैनिक गच्चीत उभे आहेत..हात थरथर करतोय...पाउस तुफान पडतोय ...खाली पाहतात तर चिमुकल्यांची टोळी भर पावसात त्यांना 'सलाम नमस्ते ' करतेय ! हो ,१५ ओगस्ट आहे त्या दिवशी...आजोबा गहिवरून येतात..उत्तरादेखील थरथरता हात कपाळा  जवळ नेतात...डोळ्यात अश्रू ...' इस देश को रखना मेरे बच्चो सम्हाल के ! असे गीतसंगीत ऐकू येते ..पाउस चालूच ....चिमुकल्या टोळीचा हात अजून नमस्ते करतोय...स्वातंत्र्य सैनिक आजोबांचा हात अजूनच  थरथरतोय      ( लाईफ ओके वाहिनी वरील हि जाहिरात पाहून डोळ्यात पाणी येते खरे...काही कलाकृती चा ठसा विसरता येत नाही...पुन्हा सलाम नमस्ते...)
( याच वाहिनीवर माझ्या जावळी तालुक्यातील दारूबंदी ची चळवळ त्या दिवशी लाईफ ओके 'वाहिनी वर ,याच कार्यक्रमात  दाखवणार आहेत...त्यातील तरुण लढवय्ये विलासबाबा जवळ यांना आम्ही पी.ए.इनामदार सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देवून गौरवले होते...इस देश को रखना मेरे बच्चो सम्हाल के ....१५ ओगस्ट रोजी लाईफ ओके जरूर पहा...लाईफ ओके होण्यासाठी अशा बऱ्याच चळवळीना तळहाताच्या फोडा सारखे जपायला हवेय...   )
--------
मृणाल ताई गोरे :एक किस्सा ! :

मृणाल ताई गोरे यांना लेखाच्या निमित्ताने भेटायची संधी नेहमी यायची ..त्या शांतपणे बोलत असायच्या..अवचित काही आठवणी निसटून यायच्या..! एकदा त्या म्हणाल्या ,'सार्वजनिक हिशेबाच्या बाबतीत आम्ही उभयता (पती -पत्नी ) खूप काटेकोर असायचो.रोज रात्री झोपण्यापूर्वी हिशेब पूर्ण झाला पाहिजे ,असा कटाक्ष असायचा .(न जाणो कोण एकाचा रात्री मृत्यू झाला तर ....हिशेब अर्धवट नको राहिला ...) ब्बाप रे आजही हि आठवण अंगावर शहारा आणते...सार्वजनिक कार्यात आता  इतके पारदर्शी कोण वागणार ?
-------
जलजले उंचे उंचे मकानात गिरा देते है....
मै तो बुनियाद का पत्थर हू !
मुझे फिक्र क्या  ?
-------
गैरसमज  

' मला एक गैरसमज दूर करायचाय.तो म्हणजे बातमीदाराने नि पक्ष असावे  हा.
असे निपक्ष वगेरे काही नसते .
असलेच तर निरुपयोगी असते.
पत्रकाराने पक्षपातीच असायला हवे ..
हा पक्षपात पीडितांच्या बाजूने असावा..हे पिडीत मग सरकार किवा अन्य कोणा मुळेही  झालेले असोत.
आपण त्यांच्या बाजूनेच उभे राह्यला हवे..! -रोबर्ट फिस्क :प्रसिद्ध पत्रकार .

( गिरीश कुबेर यांच्या आजच्या 'बुक अप ' सदरातून ....)
---------------

एक अविस्मरणीय मैफल...

हवेतील सापेक्ष आर्द्रता वाढली होती...आळंदी मधील अंध मुलींसाठी असलेल्या जागृती शाळेत पोहोचलो.अंध जनांना मदत करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम होता...गरम होत होते...मान्यवर उशिरा येणार असा अंदाज आला होता...तोपर्यंत स्टेज वर तबला आणी पेटी घेवून दोन अंध बंधू चढले...एकाच्या डोळ्यावर गोगल काळा...(त्यांच्या डोळ्याच्या खाचा पाहून डोळस लोकांना मानसिक त्रास होवू नये म्हणून घेतलेली खबरदारी ...) ...तबला ठोक ठक करून झाला ,पेटी उघडून झाली...मान्यवर तरीही पोचले नाहीत...तोपर्यंत  त्या दोघांनी हळूच कोणती तरी अनवट सुरावट अगदी हळू सुरु केली...उपस्थित गप्पा मारण्यात मश्गुल.व्यासपीठावरील या जोडीला त्याचे काय ? ते एकमेकांच्या साथीने जणू सराव करीत असल्यासारखे ...दोघांची मैफल हळुवार रंगवत होते.कोणाचेच लक्ष नव्हते. असे वाटले प्रमुख पाहुणे आले नाहीत तरी या दोघांचे काही अडणार नाही.त्यांची मैफल स्वताच्या आनंदाची चालूच राहील...अशी हळुवार तान, मंद सुरावट आणी भवताल विसरलेले ते दोन शापित गंधर्व काल माझ्या डोळ्यासमोर होते ...आळंदीतील ते  परमे ' सूर ' पाहिले आणी नकळत डोळ्यात पाणी तरारले ....खर सांगतो .
अनेक दिग्गजांच्या मैफली  सवाई गंधर्व पासून दिल्लीपर्यंत मी अनुभवल्या...पण कालची मैफल,आणी पाणी डोळ्यासमोरून हटत नाही ... 
------------------------------

--

हंबरून वासराले चाटते जवा गाय तवा मले तिच्यामंदी दिसते माझी माय?

आया बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा दुष्काळात मायचा माजे आटला होता पान्हा !
पिटा मंदी र पिटा मंदी ! पिटा मंदी पाणी टाकून मले पाजत जाय! तवा मले पिटा मंदी दिसते माझी माय?

... तान्या काट्या वेचायला माय जाई राणी ! पायात नसे वहान तिच्या फिरे अनवाणी ! काट्या कुट्या र काट्या कुट्या ! काट्या कुट्याला हि तीच मानतनसे पाय ! तवा मले काठ्यामंदी दिसते माझी माय ?

बाप माझा रोज लावी मायचा माग तुम्ह्ना बस झाल शिक्षण आता घेऊ दे हाती काम ! शिकुंषण र शिकुंषण ! शिकुंषण कुठ मोठा मास्तर होणार हाय ?
तवा मले मास्तरामंदी दिसते माझी माय ?

दारू पिऊन मायला मारी जवा माझा बाप ! थर थरार कापे अंग छातीला लागे धाप ? कासयाचा र कासयाचा ! कासयाचा गाव्रणी ला बांधली जशी गाय ! तवा मले गाईमंदी दिसते माझी माय ?

ग बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आल पाणी ! संग म्हणे राजा तुजी दिसेल कवा राणी ? भर्या डोळ्यान भर्या डोळ्यान ! भर्या डोळ्यान जवा पाहीन दुधा वरची साय तवा मले साईमंदी दिसते माझी माय ?

हंबरून वासराले! म्हणून म्हणतो पुन्हा एकदा भरावी तुजी वटी! पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझ्या पोटी ! तुझ्या चरणी , तुझ्या चरणी! तुझ्या चरणी ठेऊन माथा धराव तुज पाय ? तवा मले पायामंदी दिसते माझी माय ?

हंबरून वासरले चाटते जवा गाय तवा मले तिच्यामंदी दिसते माझी माय 

-------------
ध्येयाचा सुगंध लाभला जीवना ,आता समर्पणा पूर्ण व्हावी ...

क्रोध ,अहंकार ,जावो निरसून 
विशुद्ध कांचन ,उजळावे  

इर्षा, असूयेला नाही येथ स्थान 
निर्मळ चैतन्य खळाळते ...
-----------
एका ट्रिप ची गोष्ट:-

बॉसने सेक्रेटरीला फोन केला, ”एका आठवड्यासाठी आपण बाहेरगावी चाललो आहोत. त्यासाठीची सगळी व्यवस्था कर.”
सेक्रेटरीने नव-याला फोन केला, ”एका आठवड्यासाठी मी बाहेरगावी जाणार आहे बॉसबरोबर.”
नव-याने प्रेयसीला फोन केला, ”एका आठवड्यासाठी माझी बायको बाहेरगावी जाणार आहे. तू माझ्या घरीच राहायला ये.”
प्रेयसीने आपल्या प्रायव्हेट ट्यूशनच्या विद्यार्थ्याला फोन केला, ”मी एका आठवड्यासाठी बाहेर चालले आहे. तुला ट्यूशनला सुट्टी.”
विद्यार्थ्याने आजोबांना फोन केला, ”आजोबा, माझ्या ट्यूशनला आठवडाभर सुटी आहे. मला कुठेतरी घेऊन चला ना फिरायला.”
आजोबांनी (बॉसने)त्यांच्या सेक्रेटरीला फोन केला, ”हा आठवडा मी माझ्या नातवाबरोबर घालवणार आहे. बाहेरगावी जाणे रद्द.”
सेक्रेटरीने नव-याला फोन केला, ”बाहेरगावी जाणे रद्द.”
नव-याने प्रेयसीला फोन केला, ”आपली भेट रद्द.”
प्रेयसीने विद्यार्थ्याला फोन केला, ”माझे जाणे कॅन्सल झाले आहे. तुझी ट्यूशन सुरूच राहील.”
विद्यार्थ्याने आजोबांना फोन केला, ”ट्यूशन सुरूच राहणार आहे. आपलं जाणं रद्द.”
आजोबांनी (बॉसने ) पुन्हा सेक्रेटरीला फोन केला, ”माझा प्लॅन बदललाय. आपण बाहेरगावी जातोय एका आठवड्याकरता…...:D :D :D

-------
चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे

मी चालतो अखंड चालायाचे म्हणून
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे

डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे
हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे!

मग्रूर प्राक्तनांचा मी फाडला नकाशा
विझले तिथेच सारे ते मागचे ईशारे

चुकली दिशा तरीही आकाश एक आहे
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे (न्या रे?)

आशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचे
बेसावधास कैसे डसणार हे निखारे?

--
आज पोळी भाजताना,
वाफ बोटावर आली,
आणि आई च्या नावाची
हाक ओठावर आली
डोळ्यातल्या सरितेला,
पूर येई असा काही,
... भावनांच्या सागराला,
कळे भरती आली .....
आणि आई च्या नावाची
हाक ओठावर आली
पायी चालता वाटेने,
रुतता काटा पावलात,
माझ्या आईच्या भेगांची,
मज आठवण झाली.....
आणि आई च्या नावाची
हाक ओठावर आली
धुता कपड्यांचा ढीग,
जाई निघून हा जीव,
मज स्मरे माझी माउली,
अशाच कष्टातच न्हाली.....
आणि आई च्या नावाची
हाक ओठावर आली
आई म्हणालीच होती,
करता माझी पाठवणी,
आले घरी माझ्या सूख,
पोरी तुझ्याच पाऊली,
नुसत्या विचाराने आज,
होते पापणी ओली.....
आणि आई च्या नावाची
हाक ओठावर आली..

..............
ढाण्या वाघाचे निधन...
मी वाघ पहिला होता ! 


नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या निधनाने चटका लागून राहिला आहे...नागनाथ अण्णा हे थोर स्वातंत्र्य सेनानी होते,प्रती सरकारसाठी लढलेले नाना पाटील यांचे सहकारी होते,पण हि झाली औपचारिक ओळख .नागनाथ अण्णा हे शेतकरी,कष्टकर्यांचे ढाण्या वाघ होते...

मी लहान असताना (११ वी मध्ये ) ते कराड लोकसभा मतदार संघातून निवडणुकीला उभे राहिले होते...त्यांच्या कष्टकरी कार्य कर्त्यांनी प्रचाराचा ' जलवा ' तयार केला ...खाकी शर्ट आणि धोतर परिधान करून वावरणारे आणि शेतकऱ्याचे अस्सल प्रतिनिधी वाटणारे नागनाथ अण्णा आले कि गर्दी गोळा व्हायची...त्या प्रचारात नागनाथ अन्न्नांच्या कार्य कर्त्यांनी निवडणूक चिन्ह म्हणून चक्क खरा ' वाघ ' मतदार संघात फिरवला होता ,असे आता आठवते ! साधना मधील त्यांच्या वरचा लेख हि आठवतो आहे...एक गूढ लयाला गेले आहे..

....आता वाटते नागनाथ अण्णा यांच्या रूपाने आपण खरेच वाघ पहिला होता ! त्यांना विनम्र अभिवादन... 
...........
विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती 
म्हणून भीती नाही पराजयाची 
जन्मासाठी हटून नव्हती बसली 
म्हणून तिजला  नाही खंतही तिजला मरावयाची ....(कुसुमाग्रजांचे स्मरण,मराठी भाषा दिनानिमित्त )
..............
भरू दे यंदा मृगाचे आभाळ ,
नावाचा तुझ्या येळकोट करीन,

वाहू दे यंदा ओहळ -नाले ,
नावाचा तुझ्या येळकोट करीन,

पिकू दे यंदा खंडी  भर रास,
नावाचा तुझ्या येळकोट करीन ...

- कवी प्रकाश  होळकर
............................
भरू दे यंदा मृगाचे आभाळ ,
नावाचा तुझ्या येळकोट करीन,

वाहू दे यंदा ओहळ -नाले ,
नावाचा तुझ्या येळकोट करीन,

पिकू दे यंदा खंडी  भर रास,
नावाचा तुझ्या येळकोट करीन ...

- कवी प्रकाश  होळकर
............................
आज चा दिवस 'प्रचीती गप्पांचा ' आणि 'गप्पातून  प्रचीती ' येण्याचा...!
ज्ञान प्रबोधिनीच्या 'प्रचीती ' या युवा संघटनेत आम्ही जवळ जवळ २०० युवक-युवतींनी डॉ.विवेक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली 'विकसन हेच तत्वज्ञान ' आणि 'समन्वय हीच कार्यपद्धती ' चे धडे प्रशिक्षण आणि  कृतीतून गिरवले ...ज्यात झोपड पट्टीतील काम होते,ग्रामीण प्रज्ञा विकास,स्पर्धा परीक्षा केंद्र ,संवाद मासिक,संघटन,अभ्यास शिबिरे ,अभ्यास दौरे,आदिवासी भागात १०० दिवसांची पदसरे शाळा ,उसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी १०० दिवसांची साखर शाळा असे खूप काही होते.त्यालाच अण्णा हजारे यांचे आंदोलन आणि अविनाश धर्माधिकारी यांनी राजीनामा दिल्यावर प्रत्यक्ष सार्वजनिक जीवनातील पदार्पण अशा अनौपचारिक अनुभवांचा -सहभागाचा समावेश होता.देश प्रश्नांचा अभ्यास करताना अगदी ठाणे जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांच्या अभ्यास दौर्यापासून काश्मीर प्रश्न अभ्यास दौरयापर्यंत जाणिवांचा प्रवास होता.'भविष्य वेध ' (फ्युचरालॉजी ) काही अभ्यास केला..

या युवा गटातील अनेक जण आज स्वयंसेवी संस्थांबरोबर मोलाचे काम करत आहे.अनेक जण प्रशासन ,प्रसार माध्यमे आणि शिक्षण क्षेत्रात कामगिरी बजावत आहेत.समाजातील प्रश्नांवर काम करायचे तर अशीच क्षेत्रे निवडून आयुष्यभर काम करायचे अशी जवळपास 'शपथ ' च आम्ही मंडळीनी घेतली होती...आणि तिचे पालन करीत आहोत.

साधारण वर्षातून आम्ही सारे भेटतो...अनौपचारिक गप्पा मारतो.यंदा ज्ञान प्रबोधिनीचा सुवर्ण महोत्सव आहे...त्या पार्श्व भूमीवर आणि त्या वस्तू मध्ये होणारी आजची बैठक -गप्पा मला खूप महत्वाची वाटते .१९९० च्या दशकातील मधले हे सारे प्रशिक्षण -अनुभव ,२००० नंतर दशकभर प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात काम करून आता  २०१२ नंतर च्या परिस्थिती वर काय काम करता येईल असा जणू अंदाजच  आम्ही घेत आहोत...

म्हणून आज ' प्रचीती गप्पा ' आणि ' गप्पातून प्रचीती '   !


..........
25/09/2012
पेपर विना ,दिवस सुना !
मी वाघ पाहिला  होता ...

बाळासाहेब हजरजबाबी होते...सत्तेवर  असताना साताऱ्यात पत्रकार परिषदेत त्यांना पत्रकाराने माहितीवजा प्रश्न विचारले ' येथील चिखली धरणाचे काम इतके निकृष्ट झाले आहे कि बोटाने पण भिंतीचे सिमेंट निघते ! '
बाळासाहेब मिश्किलपणे उत्तरले -' धरणाचे नावात  चिखल  आहे न ,मग बोटाने  निघणारच ! '

वाघ  फक्त डरकाळी फोडत  नसे ,तर हास्याची  लकेर  हि निर्माण करत असे...

बाळासाहेब  ठाकरे  यांना  ,त्यांच्या  नेतृत्वाला ,कर्तृत्वाला ,वक्तृत्वाला आणि  कलागुणांना  महाराष्ट्र  विसरणार  नाही....

-----------------
आई- बाबांचा फोन आला होता..पालगड या आमच्या कोकणातील गावी शेतातील भात पिक काढले आहे म्हणून....माझ्या डोळ्यासमोर लगेच हिरवे -पिवळे शेत ,ओली  माती...अंगण भरून भाताच्या पेंढ्या ....असे सारे.. उभे राहिले..त्याचा गंध मन भरून गेला..आई ने फोन केलाच पण हे गीत पण ऐकवले ....

' देवावाणी शेत माझं नवसाला पावलं
कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं '

आपलीच माती ,आपली माणसे ...आपण दूर देशी असलो तरी मातीचा गंध आपला पाठलाग करतो ...आणि डोळ्यात पाणी आणतो .

19/10/2012