माझी ' प्रवक्ते गिरी ' ! (कोणत्याही दिवाळी अंकात प्रसिद्ध न झालेला माझा लेख
----------------------
ध्यानी मनी नसताना मी एका राजकीय पक्षाचा प्रवक्ता झालो .
आणखी तिसऱ्या common मित्रामुळे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर , माझे सासरे हे कधी मधी भेटत असायचे . एकदा ते पुण्यातील आय बी एन लोकमत वाहिनीवर लोकसभा निवडणुकीनंतर माझ्या सासऱ्या समवेत गेले होते . मुलाखतीनंतर गप्पात बिड्करांचे सासरे आणि जानकर मित्र असून दीपक बिडकर यांना तुम्ही अजून कसे भेटला नाही ? असा काहीसा प्रश्न आय बी एन च्या उत्साही पत्रकार प्राची कुलकर्णी यांनी जानकर यांना विचारला . . आणि जानकर यांनी ते मनात ठेवून पुढे माझी भेट घेतली . . पुन्हा ते जागावाटपाच्या तिढ्यात अडकल्यावर विषय बाजूला पडला . मग भेट झाली आणि पहिल्याच भेटीत आमचे सूर जुळले
अरुण निगवेकर ,डॉ अमोल देवळेकर ,सुहास यादव ,अमित कुलकर्णी यांनी आवर्जून मला सांगितले की प्रवक्ते पदाची जबाबदारी मिळत असेल तर घ्या . अद्वैत मेहता यांची सूचना अशी होती की लगेच नको ,निवडणुकीनंतर हि जबाबदारी घ्या . काँग्रेस प्रवक्ते डॉ सतीश देसाई यांना माझी नियुक्ती कळाल्यावर लगेच फोन करून शुभेच्छा दिल्या . ( अंकुश काकडे ,डॉ देसाई ,आणि मी असे तीन प्रवक्ते एक किलोमीटर परिसरात राहतो . . हा एक योगायोग ).आमचे आदरणीय सन्मित्र डॉ विश्वंभर चौधरी यांनी 'युक्तीची एक गोष्ट ' सांगितली -वाहिनीवर आपली 'turn ' येई पर्यंत खूप वेळ जातो ,एखादे जाडजूड पुस्तक सोबत ठेवा '.
'. सकाळ ' चे रोव्व्हिंग एडिटर ' संजय आवटे यांनी मुंबई साम स्टुडियो मधील भेटीत हा पक्ष तुम्ही निवडलात हे चांगले झाले ' असे सांगितले . ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनीही माझी भूमिका फोन वरून समजावून घेतली .राजकीय नव्हे तर सामाजिक अभिसरणाची माझी भूमिका आहे हे त्यांना सांगितले . अजय गोरड हे पत्रकार मित्र माहिती देण्यास सतत online उपलब्ध होते
राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रवक्ता म्हणून मी शनिवार वाडा (डीडी न्यूज ),मासाळवाडी (headlines today with Editor Rahul Kanval ), पुणे स्टुडियो (मी मराठी ,निखिल वागळे ,जयदेव गायकवाड यांच्यासमवेत ) आणि साम टीव्ही मुंबई studio (प्रकाश अकोलकर ,समीरण वाळवेकर ) यांच्यासमवेत सहभागी झालो . .वृत्तपत्रांना आवश्यक माहिती पुरवत राहिलो . इंग्रजी वृत्तपत्रांच्या qustionaire ला उत्तरे देत राहिलो
पहिल्या कार्यक्रमात शनिवार वाड्यावर DD News च्या debate मध्ये अंकुश काकडे ,गोपाल तिवारी ,उज्वल केसकर ,बाळा शेडगे ,श्याम देशपांडे या पुण्यातील दिग्गजांबरोबर उभा राहिलो आणि उत्तम हिंदीत बोललो . माझे पत्रकार मित्र दिगंबर दराडे यांनी मला तिथे बोलावले आणि रोहन गवळी या आणखी एका मित्राने दिल्लीच्या वरिष्ठांशी ओळख करून दिल्यावर मी हिंदीत बोललो आणि मला चर्चेत सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली . (मला इतकी सुरुवात पुरेशी असते
Headlines Today या दुसऱ्या राष्ट्रीय वाहिनीने मला बारामती मतदार संघातील मासाळवाडी येथे चर्चेला बोलावले .पंकज खेळकर यांनी बारामती ,जानकर ,रासप हे सगळे दिल्लीतील वरिष्ठांना सांगितल्यावर माझे नाव नक्की झाले . तिथे राष्ट्रीय समाज पक्षाचे समर्थक पक्षाचा कोणी माणूस टी व्ही वर बोलायला आलाय ,म्हणून खूपच खुश झाले होते . 'घाबरू नका ,जोरात बोला ' असा प्रेमाचा सल्ला देत होते . त्या सर्वाना मी काय बोलतो हे कळावे म्हणून ऐनवेळी इंग्रजी ऐवजी हिंदीत बोललो . मासाळवाडी वर कसा दबाव आणला गेला हे सांगितल्यावर आमच्या पक्षाच्या समर्थकांनी चक्क पाठ थोपटली
'मी मराठी ' वाहिनीवर मी बोलावे यासाठी मुंबईतून वाहिनीच्या वरिष्ठांनी सांगितले . तुळशीदास भोईटे ,रवींद्र आंबेकर यांना मी कधी भेटलो नाही . पण त्यांनी माझे नाव लगेच 'ओके ' केले . पुणे स्टुडियो मध्ये राष्ट्रवादी आमदार जयदेव गायकवाड माझ्या शेजारी बसून चर्चेत सहभागी झाले . निखिल वागळे यांच्यासारख्या 'star ' पत्रकाराने आपल्याला प्रश्न विचारावेत ,आपल्याला गुदगुल्या व्हाव्यात आणि संपर्क तुटल्याने ते आपल्याशी बोलताहेत हे न कळल्याने माझ्या उत्तराला वागळे साहेब मुकले ! पुणे studio मधील राजू निगडे यांना त्याची खूप हळहळ वाटली
निवडणूक निकाल विश्लेषणाच्या साठी 'साम मराठी ' ने बेलापूर (मुंबई ) स्टुडियो मध्ये या असे दोन दिवस आधीच सांगितले होते . मंगेश चिवटे ,विनोद राउत यानाही कधी भेटलेलो नाही . पण त्यांचा प्रेमळ निरोप मिळाला . तेथे धावत पळत गेलो . संजय आवटे यांचे ओघवते विश्लेषण चालू होते . ते झाले लगेच समीरण वाळवेकर यांनी मला आणि प्रकाश अकोलकर यांना चर्चेत सहभागी करून घेतले . महायुतीची कामगिरी कशी होईल ,मुख्यमंत्री म्हणून तुमची पसंती कोणाला राहील ,पृथ्वीराज चव्हाण यांचा आश्वासक विजय या तीन मुद्द्यांवर मला बोलता आले . प्रकाश अकोलकर यांचा अभ्यास आणि साधेपणा भावून गेला . तिथे चहा ,नाश्ता ,जेवण अशी सगळी जय्यत तयारी होति. !
आमच्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी यातील बहुतेक सर्व भाग पाहून समाधान व्यक्त केले . आमच्या पक्षाचे आधीचे प्रवक्ते मोहन अडसूळ यांचे दहा दिवसापूर्वीच अपघातात निधन झाले होते , स्वत :जानकर साहेब आजारी असल्याने मिडिया शी बोलू शकत नव्हते ,अशा वेळी सगळे आपले आपणच समजून ,उमजून बोलणे ही मोठीच जबाबदारी ठरली
राहुल कुल आमचा एक उमेदवार निवडून आला याचा आनंद ,आणि आठवले ,शेट्टी यांचा एकही आला नाही याचे दुक्ख ,मेटे पराभूत झाले याचे दुक्ख आणि त्यांचा एक उमेदवार भारती लव्हेकर जिंकल्या याचा आनंद
अशा सुख -दुख्खाच्या हिंदोळ्यावर झुलत राहिलो .
'मिडिया ची जिम्मेदारी ' तुम्हाला देतो असे २५ दिवसापूर्वी जानकर साहेबांनी अगदी विश्वासाने सांगितले होते . नंतर त्यांनी आमच्या सासरयाना सांगितले कि 'तुम्ही आम्हाला हिरा दिलाय ' यातच आपल्या धावपळीचे समाधान होते
' जानकर -बिडकर ' या महायुतीमधील 'डील 'काय ? package काय ? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे ,पण कोणी मला विचारले नाही .,तरी लोकशाहीतील पारदर्शकता या महान मूल्याला धरून मला सांगणे भाग आहे की जानकर यांनी काही रक्कम मला सुरुवातीला देवू केली
त्यातील प्रवासखर्चाइतकी रक्कम मी स्वीकारली
हा प्रवास अर्थातच एस टी मधून केला ,आणि एस टी खर्चाला पुरेल इतकीच रक्कम मी त्यांच्याकडून घेतली . .
जानकर यांच्यासारखा साधा ,प्रामाणिक ,कष्टाळू ,गाडीतच जेवण -झोप घेणारा, अविवाहित फकीर माणूस नेता म्हणून आपल्याला मिळतो . 'ऐसा नेता मिळे आम्हाला ,मग काय उणे असे ' असे मला मनापासून वाटले . राज्यभर विखुरलेले पक्षाचे समर्थक तुमच्या प्रवक्तेगिरीला दाद देतात ,त्यांच्या असेल त्या वाहनातून लिफ्ट देतात ,,नंबर शोधून आपल्या whats ap वर आणखी कोणाच्या तरी मोबाईल मधून त्याचे फोटो ,व्ही डी ओ पाठवतात ,त्यांच्या झोपडीत नेउन प्रेमाने चहा पाजतात ,जानकर आणि रासप चे नाव सांगितल्यावर आनंदाने त्यांचे डोळे लकाकतात
आणि 'घाबरू नका ,बोलत राहा ' म्हणतात ,तेव्हा....
....खिशात हात घालून पैसे मोजायची गरजच राहत नाही !