विश्वास . । ( रविवारीय लघु कथा )
एक मित्र आहे .
एका प्रतिष्ठेच्या ठिकाणी वाद होवून स्वभिमानापायी राजीनामा दिला . माझा अगदी लांबून कधी तरी त्याच्याशी संबंध येत असे.मग हळू हळू सर्वांपासून हा लांब गेला . मी कुतूहल म्हणून संपर्क ठेवला .
हा गायबच असायचा.
कधी एफ बी ,कधी एस एम एस ,कधी भेट असा उगाचच संपर्क ठेवला .
वर्षभरात सगळेच त्याला विसरले .
मी मुद्दाम संपर्क ठेवून होतो .
एकदा रात्री भेटला . त्याच्या वेदनांनी मलाच कसेसे झाले .
तो म्हणाला ,' तुम्ही का मैत्री केलीत माझ्याशी ? का चांगुलपणा दाखवता ? तुम्ही ज्या जातीतले आहात ,त्या जातीत माझी कधीच मैत्री झाली नाही आणि होणार पण नाही . अपवाद तुम्हीच . हे सगळे का केलेत ?
मी हसलो .
म्हणालो ,' अरे मित्रा ,तू तिरीमिरीत गायब झालास . जगावरच रुसलास . बरयाच जणांशी तू संबंध तोडलेस ,अनेकांनी तुझ्याशी संबंध तोडले . हळूहळू तू नजरेआड गेलास . अशा वेळी माणूस जगावर उखडलेला असतो . त्याच्यातील सूडबुद्धी जागी होते . आणि तो कोणावरही ,कशासाठीही सूड उगवू लागतो . अगदी स्वतावरही !
हे होत असताना सगळे जग ,माणसे वाईट आणि स्वार्थी असतात असे वाटत राहते . माणसे वाईट असतात असा ग्रह झाला असता तरी मला चालले असते ,पण माणुसकीवरचा तुझा विश्वासच उडाला असता तर ते मला चालले नसते . . म्हणून मी तुझ्याशी संपर्क ठेवत गेलो
(आणि मग रस्त्यावरच्या रस्त्यावरची पहाट आणखी उजळत गेली ! )
एक मित्र आहे .
एका प्रतिष्ठेच्या ठिकाणी वाद होवून स्वभिमानापायी राजीनामा दिला . माझा अगदी लांबून कधी तरी त्याच्याशी संबंध येत असे.मग हळू हळू सर्वांपासून हा लांब गेला . मी कुतूहल म्हणून संपर्क ठेवला .
हा गायबच असायचा.
कधी एफ बी ,कधी एस एम एस ,कधी भेट असा उगाचच संपर्क ठेवला .
वर्षभरात सगळेच त्याला विसरले .
मी मुद्दाम संपर्क ठेवून होतो .
एकदा रात्री भेटला . त्याच्या वेदनांनी मलाच कसेसे झाले .
तो म्हणाला ,' तुम्ही का मैत्री केलीत माझ्याशी ? का चांगुलपणा दाखवता ? तुम्ही ज्या जातीतले आहात ,त्या जातीत माझी कधीच मैत्री झाली नाही आणि होणार पण नाही . अपवाद तुम्हीच . हे सगळे का केलेत ?
मी हसलो .
म्हणालो ,' अरे मित्रा ,तू तिरीमिरीत गायब झालास . जगावरच रुसलास . बरयाच जणांशी तू संबंध तोडलेस ,अनेकांनी तुझ्याशी संबंध तोडले . हळूहळू तू नजरेआड गेलास . अशा वेळी माणूस जगावर उखडलेला असतो . त्याच्यातील सूडबुद्धी जागी होते . आणि तो कोणावरही ,कशासाठीही सूड उगवू लागतो . अगदी स्वतावरही !
हे होत असताना सगळे जग ,माणसे वाईट आणि स्वार्थी असतात असे वाटत राहते . माणसे वाईट असतात असा ग्रह झाला असता तरी मला चालले असते ,पण माणुसकीवरचा तुझा विश्वासच उडाला असता तर ते मला चालले नसते . . म्हणून मी तुझ्याशी संपर्क ठेवत गेलो
(आणि मग रस्त्यावरच्या रस्त्यावरची पहाट आणखी उजळत गेली ! )
No comments:
Post a Comment