Saturday, March 8, 2014

मानवी मनाचे महाभारत : 'आता मजा येईल ' :एक स्वगत !


------------------------------------------------------
लहानपणी म्हणजे साधारण १० वी  इयत्तेत जाण्या पूर्वी आमच्या गावी मोजक्या लोकांकडे टी व्ही होता . रंगीत  टी  व्ही एक  दोनच  होते . रविवारी महाभारत  बघायला 'भारत  बंद ' करण्याचे  दिवस  होते  ते . माहित  असलेल्या  महाभारतातील  'शिन ' उत्कंठेने  पाहिले  जायचे . खूप  गर्दी  व्हायची  त्या  टी  व्ही  भोवती !

मी  ज्यांच्याकडे रंगीत  महाभारत  पाहायला  जायचो ,त्या घरातील तरुण महाभारत एपिसोड संपला कि न चुकता  म्हणायचा ,' आता  खरी मजा येणारे ' !  म्हणजे पुढच्या  एपिसोड  मध्ये  महाभारत अजून रंगणार  आणि  अजून  पाहायला  मजा येणार . मग  आठवडा  त्या  मजेच्या  प्रतीक्षेत निघून  जायचा .
यथावकाश जमेल तेव्हढी मजा देवून महाभारत संपले .
आज  गावी गेलो कि तो टी  व्ही मालकांच्या  घरातील तरुण भेटतो कुठेतरी .
आणि  वाटते ,कि ,त्याच्या  काय - माझ्या  काय  जगण्यात  'खरी ' मजा अजून  बाकी  आहे . पण 'मजा ' असलेल्या एपिसोड  साठी दर  आठवड्याच्या 'त्या ' दिवसाकडे डोळे लावून  पाहणे  अजून  सुरूच  आहे . . .
(आज सोमवार पासून सुरु  झालेल्या आठवड्यासाठी  सर्वांनाच  शुभेच्छा ! आता  खरी  मजा येणारेय !! )

No comments:

Post a Comment