------------------------------------------------------
लहानपणी
म्हणजे साधारण १० वी इयत्तेत जाण्या पूर्वी आमच्या गावी मोजक्या
लोकांकडे टी व्ही होता . रंगीत टी व्ही एक दोनच होते . रविवारी
महाभारत बघायला 'भारत बंद ' करण्याचे दिवस होते ते . माहित असलेल्या
महाभारतातील 'शिन ' उत्कंठेने पाहिले जायचे . खूप गर्दी व्हायची
त्या टी व्ही भोवती !
मी ज्यांच्याकडे रंगीत महाभारत पाहायला
जायचो ,त्या घरातील तरुण महाभारत एपिसोड संपला कि न चुकता म्हणायचा ,'
आता खरी मजा येणारे ' ! म्हणजे पुढच्या एपिसोड मध्ये महाभारत अजून
रंगणार आणि अजून पाहायला मजा येणार . मग आठवडा त्या मजेच्या
प्रतीक्षेत निघून जायचा .
यथावकाश जमेल तेव्हढी मजा देवून महाभारत संपले .
No comments:
Post a Comment