Monday, January 14, 2013

आई- बाबांचा फोन आला होता..पालगड या आमच्या कोकणातील गावी शेतातील भात पिक काढले आहे म्हणून....माझ्या डोळ्यासमोर लगेच हिरवे -पिवळे शेत ,ओली  माती...अंगण भरून भाताच्या पेंढ्या ....असे सारे.. उभे राहिले..त्याचा गंध मन भरून गेला..आई ने फोन केलाच पण हे गीत पण ऐकवले ....

' देवावाणी शेत माझं नवसाला पावलं
कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं '

आपलीच माती ,आपली माणसे ...आपण दूर देशी असलो तरी मातीचा गंध आपला पाठलाग करतो ...आणि डोळ्यात पाणी आणतो .

19/10/2012

No comments:

Post a Comment