Friday, January 18, 2013

एक आठवण: रथ सप्तमी उपवास सूर्य पूजनाची ..
आणि गावची !


पुण्यात पत्रकार असलेला जावळी तालक्यातील एक मित्र गावी निघणार आहे.तो गावी जाणार म्हटल्यावर माझा हळवा कोपरा जागा होवून थेट झोंबणारया थंडीतील रथसप्तमी उपवासांच्या आठवणीत शिरला...!
आमच्या आजोळी जावळी तालुक्यात रथसप्तमी च्या काळात घरोघरी महिला सूर्याचे उपवास करतात.माझी आई पण करायची...रथसप्तमी ला अंगणात रांगोळी काढण,सुर्य प्रतिमा रेखाटून त्यावर गोवऱ्या ठेवून मातीच्या भांड्यात दुध उतू जाई पर्यंत तापविण्याचा विधी केला जाई. ( उगवत्या सूर्याचे हे उपवास माघ शुद्ध प्रतिपदेपासून सप्तमी पर्यंत केले जातात.सात दिवसांच्या या उपवासाला खेडोपाडी ममई (मुंबई) वरून सफरचंदे,सुका मेवा येत असे .वर्षातून एकदाच त्याचे दर्शन होई...सूर्याला अनेक नवस बोलले जातात.माझ्या आणि माझ्या बहिणीच्या जन्मापूर्वी आईने असे उपवास कारण नवस बोलले होते.! ) त्या आठवणीने आज उगाच मन भूतकाळात शिरले...डोंगराच्या कुशीत बोचरी थंडी पडलीय..शिवारात शाळू -हरभरा-पावटा डोलतोय...कौलारू घरातून सीताबाई -फुलाबाई अंगणात आल्यात...गुरांच्या गळ्यातील घंटांचा आवाज येतोय...जमेल तशी सूर्य प्रतिमा (' सुर्वे ' देवाची ! ) रांगोळीने रेखाटून गोवऱ्या प्रज्वलित केल्या जात आहेत... सुगडीत दुध उतू घालवताहेत..दूरदेशी असलेल्या नवऱ्याच्या -मुलांच्या साठी नवस बोलले जाताहेत..गोवऱ्यांचा धूर होतोय ... प्रसादाची देवाण -घेवाण होतेय...गोवऱ्याच्या धुराने ,सग्या -सोयऱ्यांच्या आठवणीने डोळे पाणावत आहेत...( तेव्हा गोवऱ्याच्या धुराने त्यांचे आणि आज आठवणीनी माझे..! )

No comments:

Post a Comment