Monday, December 15, 2014

भारत -तिबेट सीमेवरचे शेवटचे गाव

अक्राळ -विक्राळ पर्वतातून बद्रीनाथ ला गेल्यावर प्रवास संपत नाही .
पुढे चार किलोमीटर अंतरावर माना हे भारत -तिबेट सीमेवरचे शेवटचे गाव आहे . हे गाव पौराणिक -ऐतिहासिक महत्वाचे आहे . येथे सरस्वती नदीचा उगम आहे . व्यासांनी जेथे महाभारत लिहिले ती व्यास गुहा आहे .
गणेशानी व्यासांचे ऐकून महाभारत लिहून घेतली ती गणेश गुहा आहे . मुक्तीसाठी स्वर्गारोहण पर्वताकडे निघालेल्या पांडवांचा मार्ग येथून सुरु होतो .
सरस्वती नदी द्रौपदीला ओलांडता यावी म्हणून भीमाने प्रचंड शिळा आडवी पाडून केलेला भिमपुल येथे आहे . सरस्वती -अलकनंदा संगमही आहे . माना हे विणकरांचे गाव आहे . छान शाली ,टोप्या ,उबदार कपडे विणले जातात . माना गावाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे भारताची तिबेट दिशेची सीमा येथे संपते . या दिशेचे हे शेवटचे गाव आहे .
या गावाच्या शेवटी एक चहाचे दुकान आहे . तेथे 'हिंदुस्तान कि चाय कि आखरी दुकान ' आहे . नरेंद्र मोदी पोहोचायच्या आधी आम्ही तेथे पोहोचून चहा घेतला आणि फोटोही काढून घेतला . इतके विविधांगी महत्व असलेले गाव दुसरे कोणतेही नसावे . .

No comments:

Post a Comment