Monday, December 15, 2014

बद्रीनाथ ,बद्री नारायण !

बद्रीनाथ ,बद्री नारायण !
----------------------------------
हिमालयात सर्वत्र शंकराचा वास असताना बद्रीनाथ मात्र विष्णूचे स्थान आहे . बौद्ध काळात थोलीन्गमठ (तिबेट ) मध्ये बद्रीनाथ होते ,मात्र बौद्ध प्रभाव वाढल्याने ते बद्रीनाथ येथे आले असे मानतात . बद्रीनाथ ला जाण्याचा मार्ग अजूनही खडतर आहे . डोंगर , दरडी कोसळून भीती वाटेल अशा कच्च्या रस्त्याने ,अक्राळ -विक्राळ दगडी खिंडींतून ,नदीतून जावे लागते . बद्रीनाथ ची उंची ३५८३ मीटर (१० हजार फुट )आहे
वाटेत बर्फ लागतो . बद्रीनाथ ला आम्ही पोचलो तेव्हा खूप कमी गर्दी होती . जेमतेम ३० भाविक होतो . एरवी पहाटे ३ पासून दर्शनाच्या रांगा लागतात . सभोवताली बर्फाची शिखरे आहेत . रोरावत धावणारी सरस्वती ,अलकनंदा नदी बद्रिनाथाच्या मंदिराच्या पायऱ्या जवळून वाहते .
नदी आणि मंदिराच्या २० फुटाच्या अंतरात तप्तकुंड हे गरम पाण्याचे कुंड आहे . नदीच्या थंड पाण्यात हात घालावासा वाटत नाही ,आणि तप्त कुंडच्या गरम पाण्यात पण सहजासहजी हात घालावासा वाटत नाही ,असा नैसर्गिक चमत्कार आहे . सकाळी स्नान केले तर तप्त कुंडाचे गरम पाणी चटका देत नाही . गरम कुंडात उतरता येते . मंदिराला अहल्याबाई होळकर यांनी अर्पण केलेला सोन्याचा कळस आहे ! हिंदू -बौधः ,जैन सर्वाना हि बद्रीनाथाची मूर्ती आपली वाटते .
आम्ही २२ जून ला दुपारी ३ वाजता दर्शन घेतले . मुक्काम केला आणि पुन्हा सकाळी दर्शन घेतले . दोन्ही वेळा तप्त कुंडात स्नान केले . एक -दोन दिवसांचा प्रवास निर्विघ्न पार पडला कि आपण बद्रीनाथ मध्ये येतो . केदारनाथ ,अमरनाथ प्रमाणे हे दर्शन पण दुर्लभ झाले आहे .
मी पुण्याहून खास सोवळे सोबत घेतले होते . ते नेसून भगवे उपरणे अंगावर घेवून दर्शन घेतले . महाराष्ट्रीय पद्धतीचे जांभळे सोवळे नेसणारा मी एकमेव भाविक होतो . थोडी कलरफुल गम्मत !
येथे बद्रीनाथाची नाणी ,पितळी वस्तू ,उपरणी यांची खरेदी झाली .
बद्रीनाथला पर्वतातून येणाऱ्या पाण्याच्या लोंढ्या पासून वाचवायला पाट बंधारे खात्याने खास व्यवस्था केली आहे .
अनेक शास्त्री येथे पूजा ,तर्पण करायला असतात . महारष्ट्रातील बाभुळकर शास्त्री पण आहेत . पितृतीर्थ येथे पूर्वजांचे एकदा श्राद्धः केले कि सात पिढ्या ना पोचते
पांडवांशी संबंधित अनेक ठिकाणे जवळपास आहेत .व्यासानी महाभारत लिहिली ती गुहा इथपासून पांडवांचे स्वर्गारोहण ,,सरस्वती नदी याच परिसरात आहे भारत -तिबेट सीमेवरचे शेवटचे माना गाव येथून चार किलोमीटर अंतरावर आहे . ऐतिहासिक सरस्वती नदीचा उगम तेथे आहे . त्याबद्दलचा अल्बम आणि माहिती स्वतंत्र लिहित आहे

No comments:

Post a Comment