कार्यकर्त्यानो सलाम ! ( 'लोकशाही शाळेचा दुसरा दिवस ' )
---------------------------------
---------------------------------
राष्ट्रीय समाज पक्षाचे विधानसभा निवडणुकीत लढलेले -जिंकलेले -थोडक्या मतांसाठी हरलेले अशा सर्व ५ उमेदवारांचा सत्कार समारंभ पुण्यात १४ नोव्हेंबर रोजी १ वाजता होत आहे . वर्धमान लॉन्स ,गंगाधाम चौक ,मार्केट यार्ड जवळ ,पुणे येथे होत आहे .
या तयारीसाठी विभागवार मेळावे होत आहेत . आज बारामती येथे पश्चिम महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला . मी प्रवक्ता झाल्यानंतर प्रथमच पक्षाच्या मेळाव्यात बोललो . निवडणूक प्रचारादरम्यान प्रवास करताना अपघाती मृत्यू झालेल्या प्रवक्ते मोहन अडसूळ यांना आधी श्रद्धांजली अर्पण केली
त्याआधी १७ ,१३ वर्षे महादेव जानकर यांच्यासोबत खडतर कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांचे 'दर्शन ' घेता आले . बोलता आले ,ऐकता आले . . खूप बरे वाटले . कोणी महादेव जानकर कसे कष्ट उपसत एस टी stand वर झोपत ,मिळेल ते खाऊन फिरत ,स्वताचा संसार करायचा नाही ,समाजाच्या हिताला वाहून घ्यायचे हि प्रतिज्ञा करून ,पक्ष स्थापनेनंतर ११ वर्षांनी 'शासन कर्ती जमात ','शासन कर्ता समाज ' ,'शासन कर्ता पक्ष ' या पातळीवर पोचले . धनगर समाज आरक्षण आणि सत्ता यातून प्रगतीपथावर गेला पाहिजे पण अंतिम ध्येय्य काय तर 'सत्य शोधन -समाज प्रबोधन -राष्ट्र संघटन ' हा व्यापक विचार बळकट केला .
खस्ता खात पक्ष उभारणारे अनेक पायाचे दगड देवासारखे भेटले . दिसायला सगळे सावळे विठ्ठल.
. दादासाहेब केसकर तर शेतीपूरक व्यवसायातून येणारी कमाई फक्त पक्षाच्या वाढीसाठी वाहत आले . महानवर ,संपतराव टकले ,पुंडलीक्मामा काळे ,कोळसे -पाटील ,बजरंग खटके . . नावे घ्यावीत तितकी कमी .
अनेकांना जानकर साहेबाना मंत्रिपद मिळाले तर तो समाजाच्या सर्वोच्च सन्मानाचा क्षण वाटत आहे . 'आम्ही ,जानकर ,,दिलीप तुपे ,बजरंग खटके सतत निवडणुका लढायचो ,आणि सतत पराभूत व्हायचो ,पराभव नवीन नव्हता . पण हार कधीच मानली नाही ' असे खटके सांगत होते
अनेकांना पक्षाचा १४ वर्षे वनवास संपला ,जानकर यांच्यासारख्या त्यागी माणसाचा वनवास संपला असे वाटत होते आणि ते भावनांना वाट करून देत होते .
धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटेल आणि एका मागास राहिलेल्या समाजाला लोकशाही मार्गाच्या प्रगतीची कवाडे खुली होतील ,त्यात भाजपा मदत करेल असे तर सर्वाना वाटत होते
नवाच असलेल्या आणि तथाकथित उच्च वर्णीय असलेल्या म्या पामर प्रवक्त्याने काय बोलावे अशा प्रसंगी ?
' संघर्ष संपलेला नाही मात्र रचनेला सुरुवात करायला हवी . शासन कर्ती जमात -समाज -पक्ष म्हणून आपण हक्क जरूर मागितले पाहिजेत पण नव्या जबाबदाऱ्याना सामोरे गेले पाहिजे . नवी कौशल्ये ,नव्या व्यवस्था -संरचना आत्मसात करून नव्या व्यापक उद्दिष्टांकडे धाव घेतली पाहिजे ' असे सांगितले .
सर्व बांधवाना बहुदा ते आवडले असावे . कारण मेळावा संपल्यावर १५ मिनिटे माझ्याबरोबर अनेक जणांचे ' फोटो सेशन ' चालले !
मी प्रवक्ता झालो तेव्हा शनिवार वाड्यावर dd news राष्ट्रीय वाहिनीवर पुण्यातील सर्व पक्षाच्या प्रवक्त्या समवेत निवडणूक विषयक 'जनवाणी ' कार्यक्रमात सहभागी झालो होतो . त्याला मी लोकशाही शाळेचा 'पहिला दिवस ' संबोधले होते
आज राष्ट्रीय समाज पक्ष मेळाव्यात अनुभवलेला दिवस हा 'लोकशाही शाळेचा दुसरा दिवस ' माझ्यासाठी खूप शिकवून जाणारा ,ज्याला तळागाळातील आपण म्हणतो अशा जनता -जनार्दना समवेत सत्कारणी लागलेला . .
जय हो !
No comments:
Post a Comment