Monday, January 14, 2013

भरू दे यंदा मृगाचे आभाळ ,
नावाचा तुझ्या येळकोट करीन,

वाहू दे यंदा ओहळ -नाले ,
नावाचा तुझ्या येळकोट करीन,

पिकू दे यंदा खंडी  भर रास,
नावाचा तुझ्या येळकोट करीन ...

- कवी प्रकाश  होळकर
............................
भरू दे यंदा मृगाचे आभाळ ,
नावाचा तुझ्या येळकोट करीन,

वाहू दे यंदा ओहळ -नाले ,
नावाचा तुझ्या येळकोट करीन,

पिकू दे यंदा खंडी  भर रास,
नावाचा तुझ्या येळकोट करीन ...

- कवी प्रकाश  होळकर
............................
आज चा दिवस 'प्रचीती गप्पांचा ' आणि 'गप्पातून  प्रचीती ' येण्याचा...!
ज्ञान प्रबोधिनीच्या 'प्रचीती ' या युवा संघटनेत आम्ही जवळ जवळ २०० युवक-युवतींनी डॉ.विवेक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली 'विकसन हेच तत्वज्ञान ' आणि 'समन्वय हीच कार्यपद्धती ' चे धडे प्रशिक्षण आणि  कृतीतून गिरवले ...ज्यात झोपड पट्टीतील काम होते,ग्रामीण प्रज्ञा विकास,स्पर्धा परीक्षा केंद्र ,संवाद मासिक,संघटन,अभ्यास शिबिरे ,अभ्यास दौरे,आदिवासी भागात १०० दिवसांची पदसरे शाळा ,उसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी १०० दिवसांची साखर शाळा असे खूप काही होते.त्यालाच अण्णा हजारे यांचे आंदोलन आणि अविनाश धर्माधिकारी यांनी राजीनामा दिल्यावर प्रत्यक्ष सार्वजनिक जीवनातील पदार्पण अशा अनौपचारिक अनुभवांचा -सहभागाचा समावेश होता.देश प्रश्नांचा अभ्यास करताना अगदी ठाणे जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांच्या अभ्यास दौर्यापासून काश्मीर प्रश्न अभ्यास दौरयापर्यंत जाणिवांचा प्रवास होता.'भविष्य वेध ' (फ्युचरालॉजी ) काही अभ्यास केला..

या युवा गटातील अनेक जण आज स्वयंसेवी संस्थांबरोबर मोलाचे काम करत आहे.अनेक जण प्रशासन ,प्रसार माध्यमे आणि शिक्षण क्षेत्रात कामगिरी बजावत आहेत.समाजातील प्रश्नांवर काम करायचे तर अशीच क्षेत्रे निवडून आयुष्यभर काम करायचे अशी जवळपास 'शपथ ' च आम्ही मंडळीनी घेतली होती...आणि तिचे पालन करीत आहोत.

साधारण वर्षातून आम्ही सारे भेटतो...अनौपचारिक गप्पा मारतो.यंदा ज्ञान प्रबोधिनीचा सुवर्ण महोत्सव आहे...त्या पार्श्व भूमीवर आणि त्या वस्तू मध्ये होणारी आजची बैठक -गप्पा मला खूप महत्वाची वाटते .१९९० च्या दशकातील मधले हे सारे प्रशिक्षण -अनुभव ,२००० नंतर दशकभर प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात काम करून आता  २०१२ नंतर च्या परिस्थिती वर काय काम करता येईल असा जणू अंदाजच  आम्ही घेत आहोत...

म्हणून आज ' प्रचीती गप्पा ' आणि ' गप्पातून प्रचीती '   !


..........
25/09/2012
पेपर विना ,दिवस सुना !
मी वाघ पाहिला  होता ...

बाळासाहेब हजरजबाबी होते...सत्तेवर  असताना साताऱ्यात पत्रकार परिषदेत त्यांना पत्रकाराने माहितीवजा प्रश्न विचारले ' येथील चिखली धरणाचे काम इतके निकृष्ट झाले आहे कि बोटाने पण भिंतीचे सिमेंट निघते ! '
बाळासाहेब मिश्किलपणे उत्तरले -' धरणाचे नावात  चिखल  आहे न ,मग बोटाने  निघणारच ! '

वाघ  फक्त डरकाळी फोडत  नसे ,तर हास्याची  लकेर  हि निर्माण करत असे...

बाळासाहेब  ठाकरे  यांना  ,त्यांच्या  नेतृत्वाला ,कर्तृत्वाला ,वक्तृत्वाला आणि  कलागुणांना  महाराष्ट्र  विसरणार  नाही....

-----------------
आई- बाबांचा फोन आला होता..पालगड या आमच्या कोकणातील गावी शेतातील भात पिक काढले आहे म्हणून....माझ्या डोळ्यासमोर लगेच हिरवे -पिवळे शेत ,ओली  माती...अंगण भरून भाताच्या पेंढ्या ....असे सारे.. उभे राहिले..त्याचा गंध मन भरून गेला..आई ने फोन केलाच पण हे गीत पण ऐकवले ....

' देवावाणी शेत माझं नवसाला पावलं
कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं '

आपलीच माती ,आपली माणसे ...आपण दूर देशी असलो तरी मातीचा गंध आपला पाठलाग करतो ...आणि डोळ्यात पाणी आणतो .

19/10/2012